शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

...तर पुन्हा मिळेल आणीबाणीला निमंत्रण

By admin | Published: June 27, 2017 2:23 AM

आणीबाणीच्या लढ्याचे विस्मरण म्हणजे पुन्हा एकदा आणीबाणीला निमंत्रण. त्यामुळे त्या लढ्याच्या स्मृती जागविणे सदृढ लोकशाहीसाठी आवश्यक आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आणीबाणीच्या लढ्याचे विस्मरण म्हणजे पुन्हा एकदा आणीबाणीला निमंत्रण. त्यामुळे त्या लढ्याच्या स्मृती जागविणे सदृढ लोकशाहीसाठी आवश्यक आहे, असे मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.भाजपाच्या वतीने सोमवारी मुंबईत आणीबाणीविरोधी दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी सुरेश प्रभू बोलत होते. आणीबाणी विरोधातील संघर्षात सहभागी झालेल्या, तसेच तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांचा या वेळी प्रभू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते.सुरेश प्रभू म्हणाले की, ‘तत्कालीन इंदिरा सरकारने लादलेली आणीबाणी खऱ्या अर्थाने जनतेने उधळून लावली. आणीबाणीच्या विरोधातील जनआंदोलन अभूतपूर्व स्वरूपाचे होते. ५८ दिवसांच्या आणीबाणीनंतर निवडणुका झाल्या. इंदिरा गांधी आणि तत्कालीन आणीबाणी समर्थकांच्या विरोधातील रोष जनतेने मतपेटीतून व्यक्त केला. १९७७च्या निवडणुकांमध्ये जनतेमध्ये जी ऊर्जा होती, जो जोश होता, तो पुन्हा कधी फारसा पाहायला मिळाला नाही. आणीबाणी उलथून लावण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही मोठा वाटा होता, असेही प्रभू यावेळी म्हणाले.