शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

सुप्रिया सुळे राजकारणात कोणत्या ३ कामांसाठी आल्या?; बारामतीत बेधडकपणे बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 17:44 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक भूमिका आहे. काहींनी वेगळी भूमिका घेतली त्यामुळे अंतर आहेत. वैचारिक मतभेद आहेत मनभेद नाहीत असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर खासदार सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर आल्या होत्या. बारामती माझे माहेर आणि कर्मभूमी असून इथली लोकं कायम माझ्यासोबत राहिले आहेत. मतदारसंघात विकास कामांची पाहणी करण्यासाठी आली. इथले कार्यकर्ते पवार कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे कार्यकर्ते कुणाकडेही असले तरी त्याचा चुकीचा आणि वेगळा अर्थ काढू नका असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळेंनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, माझे राजकारण हे समाजकारण आहे. मी पक्षाकडे फक्त लोकसभेचे तिकीट मागितले आहे. मी राजकारणात ३ कामांसाठी आलीय. सेवेसाठी, लोकांचा, शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी आलीय. त्यामुळे मी एक सेवक म्हणून गेल्या १५ वर्षापासून बारामतीच्या लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहील. दिल्ली दरबारी माझं संसदीय कामकाज पाहता. बारामती लोकसभा मतदारसंघाची आन, बान, शान लोकसभेत पहिल्या नंबरवरच राहील यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहींच्या विचारात अंतर आले आहे. त्याचा पवार कुटुंबाशी काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही. गेली २४ वर्ष पवारांचे नेतृत्व मान्य करून असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रचंड कष्ट केलेते. आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलोय. राष्ट्रवादीतील काही घटकांना असं वाटते. वेगळ्या विचारधारेसोबत जावे तर काहींनी याच विचारावर ठाम राहायचे ठरवले. त्यामुळे ही वैयक्तिक मतभेद नाहीत. हे वैचारिक मतभेद आहेत. त्यात गैर नाही असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.

दरम्यान, अनेक वर्षे एन. डी पाटील यांनी वेगळ्या विचारधारेच्या चौकटीत राजकारण केले. शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस वेगवेगळे राजकारण असताना नाते जपले, इतकी प्रगल्भता पवार कुटुंबाकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक भूमिका आहे. काहींनी वेगळी भूमिका घेतली त्यामुळे अंतर आहेत. आज आमच्यात वैचारिक मतभेद आहेत मनभेद नाहीत असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

निवडणूक होईल असं वाटत नाही

केंद्रातला आणि महाराष्ट्रातलं सरकार सातत्याने सर्व्हेने निवडणूक लावतात. सर्व्हे फारसा चांगला नसल्याने अजूनही सरकारने महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका घेतल्या नाहीत हे चांगले नाही. दीड वर्ष उलटले तरी निवडणूक नाहीत. सामान्य माणसांनी त्यांची कामे कोणाकडे न्यायची. त्यामुळे निवडणूक होणे गरजेचे आहे. परंतु निवडणूक होतील असं वाटत नाही असा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस