शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

मच्छीमारांमधील वाद पेटला

By admin | Published: June 07, 2016 7:43 AM

पर्सेसीन नेट आणि पारंपरिक मच्छीमारांमधील वाद पुन्हा पेटला आहे.

मुंबई : पर्सेसीन नेट आणि पारंपरिक मच्छीमारांमधील वाद पुन्हा पेटला आहे. पर्सेसीन मच्छीमारांवर ५ फेब्रुवारीपासून शासनाने घातलेली बंदी पैसे देऊन उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मच्छीमार नेते दामोदर तांडेल यांनी शुक्रवारी मस्त्यविकास मंत्र्यांवर केला होता. मात्र बंदी उठवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असून तांडेल यांनी खोटे आरोप केल्याप्रकरणी दावा दाखल करण्याचा इशारा पर्सेसीन मच्छीमारांच्या संघटनेने सोमवारी दिला आहे.याआधी पर्सेसीन नेट मच्छीमारांवरील बंदी उठवण्यासाठी मस्त्यविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी १५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप तांडेल यांनी केला होता. मात्र त्याबाबतचे पुरावे सादर न करता, एसआयटीने पुरावे शोधून काढण्याचे आवाहन केले होते. मात्र बंदी उठवण्यासाठी सर्व बैठका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुरू असून तशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केल्याचा खुलासा पर्सेसीने नेट मच्छीमार संघटनेचे उपाध्यक्ष गणेश नाखवा यांनी केला आहे. शिवाय खडसे यांच्या नावाचा प्रसिद्धीसाठी वापर करताना, कोणत्याही पुराव्याशिवाय आरोप केल्याप्रकरणी तांडेल यांनी माफी मागितली नाही, तर न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नाखवा यांनी सांगितले.नाखवा म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासून मासेमारी बंद असल्याने पर्सेसीन नेट मच्छीमार कर्जात बुडालेले आहेत. त्यामुळे १५ कोटींचा हफ्ता देणे मच्छीमारांसाठी अशक्य आहे. शिवाय बंदी उठवण्यावरील सर्व चर्चा मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत सुरू आहे. सुरूवातीची पहिली बैठक केवळ खडसे यांच्यासोबत झाली होती. मात्र त्यानंतर खडसे यांच्यासोबत त्यांच्या बंगल्यावर एकही बैठक झालेली नाही.>वाद नकोच...पर्सेसिन व पारंपारिक मच्छिमारांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न दामोदर तांडेल करत असल्याचा आरोप नाखवा यांनी केला. मात्र तांडेल सारखे नेते राजकारणापायी मच्छीमारांमध्ये वाद घडवत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. तरी बंदीची अधिसूचना जारी झाल्यावर येलो गेट पोलीस ठाणे, कुलाबा पोलीस ठाणे आणि बंदर निरिक्षकांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.