शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

दादरीसारख्या घटना घडवल्या आहेत, आता दंगलीही घडवण्यात येतील - राज ठाकरे

By admin | Published: October 10, 2015 1:35 PM

दादरीसारख्या घटना या मुद्दामहून घडवल्या जात आहेत. हे सगळं निवडणुकांचं व सत्ता राखण्याचं राजकारण आहे. माझा असा अंदाज आहे की येत्या काही वर्षात देशात दंगली घडवल्या जातील

ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. १० - दादरीसारख्या घटना या मुद्दामहून घडवल्या जात आहेत. हे सगळं निवडणुकांचं व सत्ता राखण्याचं राजकारण आहे. माझा असा अंदाज आहे की येत्या काही वर्षात देशात दंगली घडवल्या जातील आणि कदाचित एखादं छोटंस युद्धही घडवलं जाईल असा थेट आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर केला आहे. विशेष म्हणजे, डोंबिवलीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की दिल्लीत एका भाजपा नेत्याला मी हा माझा अंदाज सांगितले नी त्यांचं मत विचारलं त्यावर त्यांनी हे असं होऊ शकतं असं उत्तर दिलं. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गुलाम अलींसारख्या पाकिस्तानी कलाकारांना भारतात येऊ द्यायलाच नाही पाहिजे अशी भूमिकाही राज ठाकरे यांनी मांडली. गुलाम अली हा फार मोठे गायक आहेत यात काही वाद नाहीत, पण पाकिस्तानचे आपले संबंध चांगले नसताना त्यांना बोलवायची काय गरज असा प्रश्नन त्यांनी विचारला. त्या देशामध्ये भारतीय कलाकारांना बोलवतदेखील नाहीत असे सांगत, आपल्याकडे काय कलाकारांची कमी आहे का असे विचारत आयोजकांवरही त्यांनी टीका केली.
कलाकार, खेळाडू, अक्रमसारखे कॉमेंटरी करणारे माजी खेळाडू अशा सगळ्यांना भारताचे रस्ते बंद करायले हवेत असे राज ठाकरे म्हणाले.
कल्याण -डोंबिवली शहरांचा आधीच विचका झालेला अाहे, महापालिकेत कामं होत नाहीयेत, अस असताना त्यात २७ गावांचा समावेश करून काय भलं होणार आहे असा सवाल विचारत या गावांना वेगळचं राहू द्यावे असे ते म्हणाले.