शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'अंधश्रद्धेसारखं काहीच नाही...'; पोलिसांकडून बागेश्वर महाराजांना क्लीन चिट, श्याम मानव यांना पाठवलं लेखी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 15:08 IST

नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रीयांचा 'श्रीराम चरित्र चर्चा' अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा आणि जादू-टोना प्रकाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या तक्रारीनंतर, नागपूरपोलिसांनी बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना क्लीन चिट दिली आहे. महत्वाचे म्हणजे, व्हिडीओमध्ये अंधश्रद्धेसारखे काहीही नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा तक्रारदार श्याम मानव यांना लिखित स्वरुपात उत्तरही पाठवले आहे.

नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रीयांचा 'श्रीराम चरित्र चर्चा' अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा आणि जादू-टोना प्रकाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता.

पोलिसांनी पाठवलं लेखी उत्तर - श्याम मानव यांच्या तक्रारीनंतर, नागपूर पोलिसांनी तपास केला. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला उत्तर पाठवले आहे. यात पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना क्लीन चिट दिली आहे. नागपूर पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, "व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट झाले की, त्यात धर्मप्रचाराशी संबंधित माहिती आहे. यात अंधश्रद्धेसारखी कुठलीही गोष्ट नाही.समितीनं केले होते असे आरोप? -समितीचे अध्यक्ष श्याम मानव म्हणाले होते, धीरेंद्र शास्त्री 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या आडून 'जादू-टोन्या'ला प्रोत्साहन देतात. त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर सामान्य लोकांना लुबाडण्याचा, फसवणूक करण्याचा आणि त्यांचे शोषण केल्याचा आरोपही केला होता. एवढेच नाही, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आव्हान देत, चमत्कार दाखवा, खरे ठरले तर आम्ही त्यांना 30 लाख रुपये देऊ, असेही म्हटले होते.

धीरेंद्र शास्त्रींनी दिले होते उत्तर - यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी पलटवार करत, 'मी आपले आव्हान स्वीकारतो. श्याम यांनी येथे रायपूरला यावे, तिकिटाचे पैसे मी देईन. आम्ही दिव्य दरबार लावला होतो, तेव्हा श्याम का आले नाही? ते आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व धर्मविरोधी लोक आहेत, असे म्हटले होते. एवढेच नाही, तर 'हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार,' असेही त्यांनी म्हणाले होते. तसेच आम्ही अनेक वर्षांपासून म्हणत आलो आहोत की, आम्ही चमत्कार करत नाही आणि गुरुही नाही, असेही त्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामshyam manavश्याम मानवPoliceपोलिसnagpurनागपूर