शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

गिरगाव आगीबाबत अद्याप गुन्हा दाखल नाही

By admin | Published: February 26, 2016 4:14 AM

‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी सादर केलेल्या अहवालात, आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल

मुंबई : ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी सादर केलेल्या अहवालात, आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आल्याने डी.बी. मार्ग पोलीस आता सक्रिय झाले आहेत. अग्निशमन दलाच्या अहवालानुसार, संबंधित कंपनीविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, अद्याप या प्रकरणी कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गिरगाव चौपाटी येथे आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात सदोष वायरिंगमुळे आग लागली. त्यात १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली असल्याने ही आग वेगाने पसरल्याचे अग्निशमन दलाने पालिकेला सादर केलेल्या आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. या प्रकरणी आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एन्टरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आले आहे. हा अहवाल पालिकेकडून पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर भादंवि २८५ कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई होण्याची शक्यता गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तविली आहे. मात्र, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याने अद्याप कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे डी.बी. मार्ग पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)सरकारही जबाबदार असल्याचा विरोधकांचा आरोपया भीषण आगीसाठी अग्निशमन दलाने आयोजकांवर ठपका ठेवला आहे़ मात्र, आयोजकच नव्हे, तर राज्य सरकारही जबाबदार असल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षांकडून होत आहे़या आगीच्या घटनेचा चौकशी अहवाल अग्निशमन दलाने बुधवारी पालिका आयुक्त अजय मेहता यांना सादर केला़ कार्यक्रमाच्या स्थळी असलेली सदोष विद्युत यंत्रणा व उपकरणे, तसेच स्टेजखालील ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका उडाला़ धोक्याची पूर्वसूचना आयोजकांना देऊनही, त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे़अग्निशमन दल सरकारच्या विरोधात जाऊ शकत नाही, हे माहीत होते, म्हणूनच स्वतंत्र चौकशीची मागणी करत होतो, असे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले़, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे़