शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

साखर उद्योगावर कृपादृष्टी नाहीच!

By admin | Published: March 01, 2015 2:31 AM

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसबिलापोटी देय असलेले सुमारे ३२०० कोटी रुपये थकीत राहण्याचा धोका वाढला आहे.

विश्वास पाटील- कोल्हापूरराज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसबिलापोटी देय असलेले सुमारे ३२०० कोटी रुपये थकीत राहण्याचा धोका वाढला आहे. ही संपूर्ण रक्कम किमान आणि वाजवी मूल्यातील (एफआरपी) आहे. केंद्र शासन कारखानदारीस काही ना काही मदत करील, अशी आशा होती; परंतु शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात साखर उद्योगाचा अर्थमंत्र्यांनी साधा उल्लेखही केला नसल्याने केंद्राचे पॅकेज मिळण्याची शक्यता कमीच आहे.हंगाम सुरू झाल्यापासूनच कारखानदारी केंद्र शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसली आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची साखर उद्योगप्रश्नी शिष्टमंडळाने भेट घेतली तेव्हा त्यांनी २१ जानेवारीपर्यंत काहीतरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्याला महिना उलटून गेला. अर्थमंत्री किमान अर्थसंकल्पात तरी या पॅकेजची घोषणा करतील, या आशेने कारखानदारीचे अर्थसंकल्पाकडे डोळे लागले होते; परंतु तिथेही भ्रमनिरास झाला. राज्यात यंदा ८ कोटी टन गाळप होण्याचा अंदाज आहे. त्यातील १ कोटी १० लाख टन कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील आहे. याच विभागातील कारखान्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे बिले दिली आहेत; परंतु त्यांचे शेवटच्या दीड महिन्यातील टनास किमान ४०० रुपये थकीत राहतील. राज्यातील उर्वरित कारखान्यांची ‘एफआरपी’तील टनास तेवढीच थकबाकी राहिली तरी ही एकत्रित रक्कम ३२०० कोटी रुपयांपर्यंत जाते. २ हजार कोटी थकबाकी असल्याचे साखर आयुक्तांनीच परवा जाहीर केले आहे. ही रक्कम द्यायची कशातून, हा कारखानदारीपुढे प्रश्न आहे. मूल्यांकन कमीराज्य बँकेने साखरेच्या पोत्याचे मूल्यांकनही १०० रुपयांनी कमी केले आहे. गेल्या महिन्यात ते २४३० रुपये होते. आता ते २३३० रुपये झाल्याने कारखान्यांना आणखी १०० रुपये कमी मिळतील. दुष्काळात धोंडा महिना असल्यासारखी स्थिती उद्भवली आहे.शब्दांचे नुसतेच बुडबुडे शनिवारी मांडण्यात आलेले बजेट म्हणजे शब्दांचेच नुसते बुडबुडे आहेत़ गरिबांसाठी पेन्शन व विमा योजना हीच काय ती या अर्थसंकल्पातील चांगली बाजू आहे़ यापूर्वीच्या सरकारने शेती,साखर कारखानदारी, सिंचन आदींसाठी फारसे लक्ष दिले नाही म्हणून नव्या सरकारकडून याबाबत अपेक्षा होत्या. मात्र, त्या अपूर्ण आहेत़ अर्थसंकल्पात सिंचनासाठी ५३०० कोटी रुपयांची तरतूद आहे. परंतु ती अत्यंंत अपुरी आहे. - राजू शेट्टी, खासदार हजारो कोटी रुपये करांच्या माध्यमातून उत्पन्न देणारा हा देशातील दुसऱ्या क्रमाकांचा उद्योग भाजपा सरकारला कळलेलाच नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. हा उद्योग कसा मोडीत निघेल, अशीच धोरणे केंद्र सरकार राबवीत असून, त्याचा महाराष्ट्राच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम होईल. - पी. जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक