शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

महाराष्ट्रात तूर्त चिनी गुंतवणूक नाही; चिनी कंपन्यांशी केलेले करार सध्या ‘जैसे थे’च

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 06:20 IST

गेल्या आठवड्यात केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे.

मुंबई : हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ ते रद्द केले आहेत, असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही ते म्हणाले. चीनने गलवान खोऱ्यात भारतीय जवानांना ज्या क्रूर व रानटी पद्धतीने मारहाण केली, त्यामुळे देशात संतापाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने करार रद्द केल्याची चर्चा होती.हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स (फोटोन सोबत संयुक्त भागीदारी) आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र २ अंतर्गत करण्यात आलेल्या १६ हजार कोटी रुपयांच्या १२ करारामध्ये या तीन करारांचा समावेश होता. एकीकडे आपले जवान सीमेवर मारले जात असताना चिनी कंपन्यांशी करार करणे योग्य नाही अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.>केंद्राच्या धोरणाची वाट पाहत आहोतएकूण ५ हजार २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र सरकारकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.भारत - चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी कंपन्यांशी गुंतवणुकीचे कोणतेही नवे करार करू नयेत, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने राज्यांना दिला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीchinaचीन