शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

'संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरा धंदा नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 06:41 IST

परिवर्तनाची चळवळ पुढे जात नसल्याने संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरा धंदाच उरलेला नाही, अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डाव्यांवर टीकास्त्र सोडले.

पुणे : उजव्या चळवळीच्या व्यक्ती जातीयवादी आहेतच. पण डावेदेखील धुतल्या तांदळासारखे नाहीत. तेसुद्धा जातीयवादीच आहेत. म्हणूनच परिवर्तनाची चळवळ पुढच्या टप्प्यापर्यंत जात नाही. ही चळवळ पुढे जात नसल्याने संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरा धंदाच उरलेला नाही, अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डाव्यांवर टीकास्त्र सोडले. मात्र याचा अर्थ संघ गोंजारण्यासारखा किंवा पुजण्यासारखा आहे, असा होत नाही, अशी सावधपणाची भूमिकाही त्यांनी घेतली.ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान वाई आयोजित ‘हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन एक प्रबोधनात्मक मंथन’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरप्रणाली अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. राजा दीक्षित, पत्रकार संजय आवटे, अ‍ॅड. शारदा वाडेकर, प्रतिष्ठानचे विश्वस्त रमेश चव्हाण उपस्थित होते.सबनीस यांनी रा. ना. चव्हाण यांच्या हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटनाच्या वैचारिक लेखनाचा धांडोळा घेताना संघाची निती, विचारसरणीवरही भाष्य केले. ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने हिंदू हा धर्म नसून, जीवनप्रणाली आहे आणि ती भारतीयांशी सुसंगत आहे, असा निकाल दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदू या शब्दाचा गैरवापर करून भाजपाप्रणीत हिंदुत्ववादी संघटनांनी बहुसंख्येच्या बळावर धर्मनिरपेक्ष हा शब्द बाजूला केला. प्रतिष्ठानचे विश्वस्त सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले.त्यांची विद्वता नासली आणि कुजली...कॉम्रेड शरद पाटील हे विद्वान होते. पण अब्राम्हणी तत्त्वज्ञानाच्या विषम अशा मांडणीमध्ये त्यांची विद्वता नासली आणि कुजली. म्हणून त्यांची भूमिका क्रांतिकारी आणि सर्व समाजाला जोडू शकली नाही, असे मत डॉ. सबनीस यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात उल्हास पवार यांनी अतिरेकी अस्मिता जागृत होत असताना विवेकी हिंदुत्वाची मांडणी रा. ना. चव्हाण करतात. सुधारक आणि विचारवंतांची तुलना करण्यापेक्षा त्यांची विवेकी चिकित्सा करायला हवी. वाद, परिसंवाद आणि संवादातून विवेचन व्हायला पाहिजे याकडे लक्ष वेधले.हिंदू शब्द घुसडवून हा हिंदूंचाच देश असल्याचे भासवत हिंदू धर्म आधारित राज्यघटना आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, म्हणून मुस्लिमांचा विटाळ आता न मानण्याची संघप्रमुख मोहन भागवत यांची सुधारणावादी भूमिका, रामजन्मभूमीच्यानिमित्ताने कायदा करून तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही याची पूर्ण खात्री असताना २०१९ ची निवडणूक लढवण्याची चाललेली धडपड या गोष्टी दिसत आहेत. पण रा. ना. चव्हाण यांचे हिंदुत्व यापेक्षा खूप वेगळे आहे. रा. ना. चव्हाण यांचा समृद्ध वारसा निर्माण होण्याची गरज आहे.अतिरेकीला जनाधार मिळाला...आजच्या टप्प्यावर अतिरेकी आणि राजकीय हिंदुत्वाला यश आणि जनाधार मिळाला आहे. हे असे का झाले, याची वस्तुनिष्ठ कारणमीमांसा हिंदुत्ववाद्यांकडून व्हायला हवी, तर विरोधकांकडून ठोस कृतीतील विचार अपेक्षित आहे. दोन्हींकडून आत्मपरीक्षणाची गरज आहे. ज्यामध्ये दोघेही कमी पडत आहे. हे आत्मपरीक्षण योग्य झाले तर भारतचे धार्मिक भवितव्य चांगले आहे अन्यथा ते चिंताजनक आहे. इतिहासाचे विकृतीकरण, महापुरुषांचे अपहरण चालू आहे. ऐतिहासिक असाक्षरता पाहायला मिळत आहे. यामध्ये हिंदुत्वाचा विचार करणे कसरतीचे काम आहे.- डॉ. राजा दीक्षित

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाBJPभाजपाShripal Sabnisश्रीपाल सबनीस