शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

मतदान यंत्रणेचे नियोजन नाही

By admin | Published: January 25, 2017 10:43 PM

एका मतदान केंद्रावर ४ पेक्षा अधिक यंत्रे असू शकतात, हे गृहीत धरून या दृष्टीने नियोजन झाले नसल्याचे प्रत्यक्ष काम करणाºया जाणकारांचे गाºहाणे आहे.

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान होईल, असे गृहीत धरून पुरेशी यंत्रणा नियोजित न करता पालिका निवडणुकीत कमी मतदान होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. एका मतदान केंद्रावर ४ पेक्षा अधिक यंत्रे असू शकतात, हे गृहीत धरून अधिकारी, कर्मचाºयांचे काम सुलभ व्हावे, या दृष्टीने नियोजन झाले नसल्याचे या यंत्रणेत प्रत्यक्ष काम करणाºया जाणकारांचे गाºहाणे आहे. 
 सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० ही मतदानाची वेळ आहे. मात्र, दिवसभरात कोणत्याही वेळी केंद्रावर रांगा लागण्याची, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे एखाद्या केंद्रावर जास्त गर्दी होण्याची शक्यता असते. प्रभाग पद्धतीमध्ये होणाºया मतदानामध्ये एका मतदाराला चारही मते देणे आवश्यक आहे. चार मते दिल्यानंतरच कंट्रोल पॅलेट दुसºया मतदारासाठी खुले होणार आहे. त्यामुळे एखाद्या मतदाराने कमी मते देणे, चुकीचे बटण दाबले जाणे, अशिक्षित मतदारांना मतदान कसे करावे याची माहिती देण्यामध्ये वेळ द्यावा लागणे, असे प्रकार होऊ शकतात. 
एका मतदान केंद्रावर मतदाराचे नाव यादीमध्ये पडताळून पाहणे, मतदार स्त्री-पुरुष असल्यास तशी नोंद करून तर्जनीला शाई लावणे, सर्व यंत्रांचे कंट्रोल युनिट नियंत्रित करणे आणि ही सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडते किंवा कसे हे पाहणे, अशा स्वरूपाचे मतदान यंत्रणा काम करते. 
 एका मतदानासाठी साधारणत: ४० ते ५० सेकंद लागतात. मतदार ज्येष्ठवयीन असल्यास किंवा अशिक्षित असल्यास त्यापेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे या यंत्रणेतील जाणकारांचे निरीक्षण आहे. कागदी मतपत्रिकेवर शिक्का मारण्याची पद्धत असताना एका केंद्रावर केंद्राध्यक्षासह ५ निवडणूक कर्मचारी असत. मतदान होईपर्यंत या कर्मचारी व अधिकाºयांना जेवण करणे, नैसर्गिक विधीसाठी केंद्राबाहेर जाणे यांवर मोठी मर्यादा येते. 
एखाद्या केंद्रामध्ये कर्मचारी, अधिकारी अचानक आजारी होण्याची शक्यता गृहीत असते. त्यासाठी पर्यायी मनुष्यबळ प्रत्येक शाळेत एक या संख्येने तरी असले पाहिजे. मात्र, मुख्यालयात हे राखीव मनुष्यबळ ठेवले जाते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी राखीव कर्मचारी नेमण्याची वेळ आली, तरी त्या वेळेपर्यंत मतदान प्रक्रिया थांबून राहण्याची शक्यता असते. 
पालिका निवडणुकांमध्ये विशेषत: झोपडपट्टी प्रभागातील काही गटांमध्ये अधिक उमेदवार असू शकतात. काही ज्या गटामध्ये ११ पेक्षा अधिक उमेदवार आहेत, त्या 
के ंद्रांमध्ये यंत्रांची संख्या वाढल्यास निवडणूक अधिकाºयांची संख्या कमी असल्याने ताण येऊ शकतो, असे या जाणकारांचे म्हणणे आहे.