शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सरकारी जमिनीवरील बेकायदा बांधकाम नियमित करण्याची तरतूद नाही - हायकोर्ट

By admin | Published: March 24, 2017 2:06 AM

राज्यातील बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्यासंबंधी प्रस्तावित धोरणाला परवानगी द्यावी, यासाठी राज्य सरकारने

मुंबई : राज्यातील बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्यासंबंधी प्रस्तावित धोरणाला परवानगी द्यावी, यासाठी राज्य सरकारने केलेल्या अर्जावर गुरुवारपासून निकाल वाचन सुरू झाले आहे. या निकाल वाचनादरम्यान उच्च न्यायालयाने सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेले बांधकाम नियमित करण्याची तरतूद कायद्यात नाही. तसेच राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ नुसार याला परवानगीही नाही, असे निरीक्षण नोंदवले.राज्य सरकारच्या प्रस्तावित धोरणामध्ये आरक्षित भूखंडावरील बेकायदा बांधकाम नियमित करण्यासंदर्भात अटी घालण्यात आल्या आहेत. आरक्षित भूखंडाचे आरक्षण रद्द केले असले पाहिजे किंवा अन्य ठिकाणी आरक्षण दिले असले तरच त्यावरील बांधकाम नियमित करण्यात येईल. याचाच अर्थ राज्य सरकार बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी आरक्षण बदलण्याचा घाट घालणार. राज्य सरकार बेकायदा इमारतींमधील फ्लॅट मालकांना आणखी एक कारण देणार, असेही निरीक्षण उच्च न्यायालयाने निकाल वाचनादरम्यान नोंदवले. उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड, दिघा व अन्य ठिकाणचे बेकायदा बांधकाम तोडण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची सर्व बांधकामे नियमित करण्यासाठी धोरण आखले. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्य सरकारने धोरण आखल्याने राज्य सरकारला धोरण अंतिम करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने धोरण अंतिम करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जावर न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी गुरुवारपासून निकाल वाचन करण्यास सुरुवात केली. सरकारी जमिनीवरील बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी मालकाला संबंधित प्रशासनाकडून जमीन हस्तांतरित करून घ्यावी लागेल, असे प्रस्तावित धोरणात म्हटले आहे. यावरही उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. ‘सरकारी जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि योग्य असली पाहिजे, असे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरकारी जमीन हस्तांतरित करण्यापूर्वी सामान्य नागरिकांना त्याविषयी माहिती देऊन निविदा मागवणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य सरकार अशाप्रकारे संबंधित मालकांना जमीन हस्तांतरित करू शकत नाही,’ असे खंडपीठाने निकालात म्हटले आहे. (प्रतिनिधी)