शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

पूररेषा बाधितांना दिलासा नाहीच

By admin | Published: September 23, 2014 4:48 AM

गोदावरी नदीतील पुरामुळे बाधित झालेल्या गावठाण क्षेत्रातील मिळकतधारकांना अटी-शर्तींवर बांधकामासाठी परवानगी देण्याचा महासभेचा निर्णय कागदावरच राहिला

नाशिक : गोदावरी नदीतील पुरामुळे बाधित झालेल्या गावठाण क्षेत्रातील मिळकतधारकांना अटी-शर्तींवर बांधकामासाठी परवानगी देण्याचा महासभेचा निर्णय कागदावरच राहिला आहे. त्यामुळे पूररेषेतील एकाही बाधिताला अजून बांधकामाची परवानगी मिळालेली नाही.१९ सप्टेंबर २००८ मध्ये गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने गोदावरी नदीला महापूर येऊन हजारो नाशिककर बाधित झाले. त्यानंतर महापालिकेने तातडीने बांधकामांच्या परवानग्या थांबविल्या. नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असल्याने पूररेषा आखण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पाटबंधारे खात्याने गोदावरीसह अन्य तीन नद्यांचीदेखील पूररेषा आखली. त्यामुळे सुमारे साडेतीन हजार बांधकामांचा प्रश्न निर्माण झाला होता. पूर येण्याआधी ज्या बांधकामांना महापालिकेने परवानगी दिली होती त्यांना पूर्णत्वाचा दाखला देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दाखले देण्यात आले. परंतु नवीन बांधकाम करण्यासाठी परवानगीच दिली जात नाही. त्याचा फटका गावठाणातील रहिवाशांना बसला.जुने मोडकळीस आलेल्या वाड्यांचा पुनर्विकासासाठी महापालिका एकीकडे परवानगी देत नाही आणि दुसरीकडे वाडे मोडकळीस आल्याने त्यांची डागडुजी करण्यासाठी नोटिसा दिल्या जातात, असा नाशिककरांचा आक्षेप आहे. दोन महिन्यांपूर्वी महासभेत झालेल्या चर्चेत फक्त गावठाण भागात बांधकाम परवानग्या देण्याचा निर्णय झाला. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही. नगरसचिव विभागाकडून नगररचना विभागाला असा कोणताही ठराव प्राप्त झाला नसल्याने एकही बांधकाम परवानगी देण्यात आलेली नाही. (प्रतिनिधी)