शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

गोवंश हत्या बंदीच्या कायद्याला स्थगिती नाही - मुंबई हायकोर्ट

By admin | Published: April 29, 2015 12:30 PM

राज्य सरकारच्या बहुचर्चित गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने बुधवारी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २९ - राज्य सरकारच्या बहुचर्चित गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने बुधवारी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र गोमांस बाळगणा-यांवर हायकोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही कारवाई करु नका असे आदेश हायकोर्टाने दिले आहे. 
१९ वर्षांपासून रखडलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्यावर मार्चमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्वाक्षरी केल्याने महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला आहे. मात्र या निर्णयावरुन राज्य सरकारवर टीकेची झोड उठली असून लोकांनी काय खावे यावरही राज्य सरकार नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप अनेकांनी केला होता. या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात तीन वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या. यात कायद्यातील कलम ५ (ड) व ९ (अ) ला  आव्हान देण्यात आले होते. यानुसार परराज्यातून आलेल्या गोमांसचे सेवन व बाळगणे गु्न्हा ठरत असून या कलमांविरोधात याचिका दाखल झाल्या होत्या. या कलमांमुळे माणसाच्या मुलभूत हक्कावरच गदा येत असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटले होते.  बुधवारी हायकोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर गोवंश हत्याबंदीच्या कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.