शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

मिरजेत पाण्याची रेल्वे पोहोचली

By admin | Published: April 09, 2016 10:33 PM

लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्याहून निघालेले रेल्वे टँकर मिरजेत शनिवारी रात्री पोहोचले. मिरज स्थानकातील यंत्रणेमार्फत टँकर भरण्याची क्षमता नसल्याने चार दिवसात

जलवाहिनीचे काम सुरू : लातूरला पाण्यासाठी आणखी चार दिवसांची प्रतीक्षा 

मिरज : जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर लातूरला पाणी पाठविण्यात येणार आहे. तत्पूर्वी रेल्वे जलशुध्दीकरण केंद्रापासून यार्डापर्यंत जलवाहिनीच्या कामाचा प्रारंभ जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आला. लातूरला मिरजेतून रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. कृष्णा नदीतून उचललेले पाणीच थेट रेल्वेत भरले जाणार आहे. एक रेल्वे ५० टँकरची असून प्रत्येक टँकर पन्नास हजार लिटरचा आहे. त्यासाठी रेल्वे पाणीपुरवठा केंद्रापासून यार्डापर्यंत १ कोटी ८४ लाख खर्चून अडीच किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकारणामार्फत करण्यात येणाऱ्या या कामासाठी टंचाई निधीतून मंजुरी रखडली असल्याने वरिष्ठ पातळीवरून हालचाली होऊन शनिवारी काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र रेल्वे प्रशासनाकडून जलवाहिनीच्या आराखड्यास तांत्रिक मंजुरी मिळावी यासाठी जिल्हाधिकारी गायकवाड यांनी रेल्वेस्थानकात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. जलशुध्दीकरण केंद्रास भेट देऊन जलवाहिनीच्या कामाची पाहणी केली. रेल्वे टँकर मिरजेपर्यंत पोहोचले तरी जलवाहिनीच्या कामास सुरुवात नसल्याने जिल्हाधिकारी गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी जीवन प्राधिकरण व रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलवाहिनीच्या कामाचा प्रारंभ केला. हे काम पूर्ण होण्यास चार दिवस लागणार असल्याने तोपर्यंत मिरजेत पोहोचलेले ५० टँकर भरून लातूरला पाठविण्यासाठी रेल्वेच्या उपलब्ध यंत्रणेचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले. रेल्वेच्या जुन्या जलवाहिनीव्दारे स्थानकातील प्लॅटफॉर्म दोनवरून पाणी भरण्यासाठी प्लॅटफॉर्म दोनवर येणाऱ्या प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक बदलून अन्य प्लॅटफॉर्मकडे वळविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकांशी चर्चा केली. रविवारी रात्रीपर्यंत टँकरमध्ये पाणी भरून सोमवारी ते लातूरला पाठविण्याचे प्रयत्न सुरू असताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्लॅटफॉर्मवरून पाणी भरण्यास नकार दिला. त्यामुळे मिरजेत रेल्वे टँकर उपलब्ध झाल्यानंतरही लातूरकरांना पाण्यासाठी आणखी चार दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. (वार्ताहर)

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली....

जलवाहिनी खोदाईस शनिवारी सुरुवात झाली. रेल्वेकडून तांत्रिक मान्यता मिळविण्यासाठी आराखडा सादर करण्यात आला. रेल्वे यार्डात सिग्नल यंत्रणेचे जाळे असल्याने तेथे खोदकाम करण्यास अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने एक हजार मिटर लांबीची लोखंडी जलवाहिनी जमिनीवरून नेण्यात येणार आहे. जलशुध्दीकरण केंद्रापासून जलवाहिनीसाठी पीव्हीसी पाईप मिळत नसल्याने पाईप उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. रेल्वेच्या यंत्रणेमार्फत आलेले टँकर रात्री दहा ते पहाटे तीनपर्यंत सहा तास भरण्याची तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी ५० टँकर पाणी भरून रेल्वे लातूरला पाठविण्याचे नियोजन सुरू होते. मात्र सायंकाळी अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या यंत्रणेमार्फत २५ लाख लिटर पाणी भरण्याची क्षमता नसल्याने टँकर भरण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे आता चार दिवसात जलवाहिनीचे काम पूर्ण करून टँकर पाठविण्यात येणार आहेत.

विभागीय व्यवस्थापकांकडून पाहणी....

 रेल्वेचे पुणे विभागीय व्यवस्थापक दादा भोय यांनीही मिरजेतील पाणीपुरवठा व्यवस्थेची पाहणी केली. यार्डापर्यंत जलवाहिनीच्या तांत्रिक मान्यतेसाठी आराखडा पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. व्यवस्थापक सकाळी कोल्हापूरला रवाना झाल्याने त्यांची व जिल्हाधिकाऱ्यांची भेट होऊ शकली नाही. मिरज स्थानकात अधिकाऱ्यांसोबत निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी बैठक घेतली. याप्रसंगी स्थानक अधीक्षक व्ही. रमेश, मकरंद देशपांडे, गजेंद्र कुल्लोळी, संदीप शिंदे, रोहित चिवटे, मनोहर कुरणे, ज्ञानेश्वर पोतदार उपस्थित होते.