शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

घोटाळे झालेच नाही

By admin | Published: December 23, 2015 11:34 PM

विरोधी पक्षातर्फे राज्यातील तीन मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्यांचे गंभीर आरोप करण्यात आले होते. विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तर विधान परिषदेमध्ये विरोधीपक्ष नेते

नागपूर : विरोधी पक्षातर्फे राज्यातील तीन मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्यांचे गंभीर आरोप करण्यात आले होते. विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तर विधान परिषदेमध्ये विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. या तिन्ही मंत्र्यांनी बुधवारी विधानसभेत सफाई देत आपल्यावरील घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले.ई-टेंडरिंगद्वारे पारदर्शक निविदा प्रक्रिया - बावनकुळे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरुद्ध कृषी सौरपंप खरेदी योजनेत शेकडो कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात बुधवारी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सफाई देत संगितले की सौरऊर्जा पंप खरेदीसाठी ई-टेंडरींगद्वारे पारदर्शक निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. यात कमीत कमी बोली लावणाऱ्या निविदकास निविदा दिली आहे. अजून एकही सौरपंप लागलेला नाही, करारही झाला नाही, तर घोटाळा होण्याचा प्रश्न आलाच कुठून. मी या खात्याचा मंत्री असेपर्यंत एक पैशाचाही भ्रष्टाचार होणार नाही. आमच्या सरकारने एकही विद्युत शुल्क माफ केले नाही. सर्व आरोप खोटे आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.शिक्षण संस्थांचालकांच्या दबावामुळे आरोप - तावडे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर अर्ली रिडर बुक व महापुरुषांच्या फोटो खरेदीत ९४ कोटी रुपयांचा घोटाळ्याचा आरोप लावण्यात आला होता. या आरोपाचे खंडन करीत तावडे यांनी सांगितले की, आघाडी शासनात ७८ कोटी रुपयांची अर्ली रिडर बुक खरेदी करण्यात आले होते. आपण ते १९ कोटी रुपयात खरेदी केले. तसेच महापुरुषांचे प्रत्येक फोटोमागे ४८०० रुपये खर्च होत होते. ते आपण १३०० रुपयावर आणले. त्यामुळे यात घोटाळ्याचा प्रश्नच येत नाही. माझ्यावरील आरोप हे केवळ मी शिक्षण संस्थांची कमाई बंद केली असल्याने संस्था चालकांच्या प्रेमापोटी व दबावापोटी केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पाच हजार द्या आणि गणपतीची मूर्ती घेऊन जा - सावरा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनीआदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोटाळा करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून ८ लाख रुपये किमतीचा सोन्याचा गणपती भेट म्हणून स्वीकारला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याचे उत्तर देतांना सावरा यांनी सांगितले की, विरोधकांनी ती मूर्ती माझ्याकडून ५ हजार रुपयात घेऊन जावी. मी संवेदनशील व्यक्ती आहे. या आरोपामुळे मी खूप व्यथित झालो. परंतु जशास तसे उत्तर देण्याचे मी ठरविले. आपण कुणालाही पाठीशी घालत नाही. घोटाळा करणाऱ्यांविद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे, मी सार्वजनिक जीवन सोडून देईल, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.