शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
2
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
3
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 
4
जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म?
5
Babita Phogat : "'दंगल'ने २००० कोटी कमावले, पण माझ्या कुटुंबाला फक्त..."; बबिता फोगाटचा मोठा खुलासा
6
वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?
7
हवं तर टोल घ्या, पण...; टोलमाफीनंतर ठाण्यात ट्राफिक जाम, शेवंता भडकली, म्हणते- "सकाळी ७ वाजता..."
8
AUS vs IND: 'पुणे-मुंबई मार्गावर' मिळणार ऑस्ट्रेलियाचं तिकीट; Cheteshwar Pujara ही शर्यतीत
9
Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा
10
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
11
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."
12
Gulabrao Patil : "मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
13
गुरुपुष्यामृत योग: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय आवर्जून करा; गुरु-शनी शुभ करतील!
14
Baba Siddique Death News : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव
15
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
16
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा
17
Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?
18
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
19
Investment Tips : धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव
20
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 

ते 'गाडीभर' पुरावे म्हणत होते, आपल्याकडे कुणी 'सुटकेसभर'ही म्हणत नाही? सरकारच्या कारभारावर पृथ्विराज चव्हाण म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 10:50 AM

"अलिकडच्या काळात शिंदे सरकारने जी बेधुंद टेंडर काढली आहेत, रोड कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. त्याच्या किंमती वाढून, त्याच्या किंमती वाढवून कशा पद्धतीने रोड काँट्रॅक्ट झाले आहेत, त्याचाही पाढा आम्ही वाचणार आहोतचना.""

काँग्रेस नेते पृथ्विराज चव्हाण यांनी राज्यातील महायुती सरकारच्या कारभारासंदर्भात भाष्य केले आहे. त्यांनी महायुती सरकारची स्थापना, अदानींचा धारावी पुनर्वसन प्रकल्प, अलिकडच्या काळात शिंदे सरकारने काढलेली टेंडर्स, रोड कॉन्ट्रॅक्ट आणि या निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरणामा अशा अनेक विषयांवर रोखठोक भाष्य केले आहे. ते लोकमतसोबत बोलत होते. यावेळी मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत डिजिटल मीडियाचे संपादक आशिष जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी, महाराष्ट्रात या सरकारने काय घोटाळे केले किंवा या सरकारवर भ्रष्टाचाराचे जे काही आरोप केले जात आहेत, या सर्व गोष्टींसंदर्भात आपल्या सारख्या अभ्यासू नेत्याने, ज्यांना अर्थ विषयाची जाण आहे, आपण मंत्रालयात मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे, राज्य पाहिले आहे, कुणी बोलत का नाही सरकारच्या विरोधात? असा प्रश्न विचारला असता पृथ्विराज चव्हाण म्हणाले, "माझ्याकडे जाहीरणामा करायची जबाबदारी दिली होती. तो दोन तीन भागांत येईल. एक आमच्या काही गॅरंटीज असतील, ते गॅरंटी कार्ड म्हणून प्रत्येक घरात पोहोचवण्याचा प्रयत्न करू. याशिवाय आम्ही 100 दिवसांत काय करू याची एक सुची येईल आणि नंतर आमचे पाच वर्षांचे व्हिजन काय असेल? अशा दोन तीन भागांत आम्ही जाहीरनामा करणार आहोत. जाहीरनामा फार मोठा झाला तर तो कुणी वाचत नाही आणि ती केवळ एक यादी असते. मग आपापला घटक आपापले मुद्दे घेतो आणि बाकी कुणी तिकडे वाचत नाही. म्हणून आम्ही अशा पद्धतीने कारायचा प्रयत्न करतोय." 

...ही चर्चा होऊद्या ना, आम्हाला हवीच आहे -यावर चव्हाण यांना पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आणत प्रश्न विचारण्यात आला की, या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरो होत आहेत, तर तुमच्याकडून, तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते असतील, सुशिलकुमार शिंदे आहेत किंवा जे वरिष्ठ नेते आहेत ते कुणीच सरकारच्या कारभारावर बोलत नाहीत? यावर पृथ्विराज चव्हाण म्हणाले, "ज्या प्रकारे हे सरकार अस्तित्वात आले, हा मुख्यमुद्दा आहेचना आणि विशेषतः ज्या आमदारांनी पक्षांतर केले आहे, काही अर्थकारण करून. ती चर्चा ते घोषवाक्य लोकांच्या तोंडात आहे. तिथे हा मुद्दा अधिक चालेल. त्या आमदारांच्या बाबतीत. त्या मतदारांनी त्यांना विश्वासाने मते दिली आणि त्यांनी त्या विश्वासाचा सौदा केला. त्यामुळे ते जेव्हा मतदारांपर्यंत जातील, तेव्हा हे खरे आहे का, की तुम्ही 50-50 कोटी रुपये घेतले. मग काय झालं? मग ते सांगतील की, आम्ही असे नाही केले आम्ही विचाराने गेलो. ही चर्चा होऊद्या ना. आम्हाला हवीच आहे." 

यावर हे आमदारांविषयी झाले, आम्ही सरकारच्या कारभाराविषयी बोललो? यावर चव्हाण म्हणाले, एक भागा आमदारांचा विषय महत्वाचा आहेच. ज्याला 50 खोके म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अलिकडच्या काळात शिंदे सरकारने जी बेधुंद टेंडर काढली आहेत, रोड कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. त्याच्या किंमती वाढून, त्याच्या किंमती वाढवून कशा पद्धतीने रोड काँट्रॅक्ट झाले आहेत, त्याचाही पाढा आम्ही वाचणार आहोतचना."

...पण, आपल्याकडे 'सुटकेसभर'ही कुणी म्हणत नाहीत, त्याचे काय?यावर, एक एक विषय घेऊन, मागे जसे देवेंद्र फडणवीस विरोधात होते, तेव्हा आमच्याकडे 'गाडीभर' पुरावे आहेत एरिगेशनचे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. पण, आपल्याकडे 'सुटकेसभर'ही कुणी म्हणत नाहीत, त्याचे काय? असा प्रश्न केला असता, चव्हाण म्हणाले, "म्हणायचेही नाही, आम्ही दाखवूना. आता अदानींच्या बाबतीत, मी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला असताना, राधाकृष्ण विखे आणि आम्ही अदानींच्या धारावी पुर्वसन प्रकल्पाबद्दल श्वेतपत्रिका काढू, असे जाहीर आश्वासन  दिल्याचे आपणही दाखवले. मीही तेथे बोललो होतो. काय झाले त्या आश्वासनाचे? आज तुम्ही बेधडक मुंबई विकायला काढली आहे. हे मुद्दे निवडणुकीचे आहेतचना. आता ते आधी काढायचे की ऐन निवडणूक रंगात आल्यावर काढायचे? ते आम्ही ठरवू, कसे करायचे ते, असे चव्हाण म्हणाले.

बघा संपूर्ण मुलाखत... -

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी