शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

'साठी'मुळे दानवे युतीबाबत सकारात्मक - उद्धव ठाकरेंचा टोला

By admin | Published: January 25, 2017 7:27 AM

'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी रावसाहेब दानवेंवर टीकास्त्र सोडले आहे..

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती आता व्हेंटिलेटरवर गेली असली तरी भाजपा नेते युतीबाबत अद्याप सकारात्मक आहेत. याच मुद्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी 'सामना'तून खडे बोल सुनावले आहेत. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली असून वयाच्या 'साठी'मुळेच दानवेंना  सकारात्मक विचार सुचत आहेत, असा टोला हाणला आहे. लाखो शिवसैनिक हीच आमची ताकद आहे व त्यांच्या बळावर आम्ही कोणतीही अटीतटीची लढाई लढायला सज्ज आहोत, असे नमूद करत त्यांनी अप्रत्यक्षरित्या 'स्वबळावर' लढण्याचा इशारा दिला. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात ?
-  मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू  झाली आहे. आघाडय़ा बनत आहेत आणि आघाडय़ा तुटतही आहेत. आयाराम-गयारामांचाही धुरळा उडू लागला आहे. पण सर्वच राजकीय पोंगापंडितांचे लक्ष लागले आहे ते मुंबईत काय होणार? युतीचे कसे होणार? हे सर्व विषय हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारीस आम्ही मार्गी लावू. १९४७ साली देश स्वतंत्र झाला असला तरी हिंदुस्थान नामक भूमी ‘प्रजासत्ताक’ देश खऱया अर्थाने बनला तो २६ जानेवारी १९५० रोजी. या दिवसापासून देशाला स्वतःची घटना, कायदे-कानून मिळाले. नवे अस्तित्व, नवी झेप मिळाली. हिंदुस्थान हे खऱया अर्थाने Republic State म्हणजे प्रजासत्ताक राज्य बनले. त्यामुळे प्रजासत्ताक दिनीच आम्ही फैसला करणार आहोत. लाखो शिवसैनिक हीच आमची ताकद आहे व त्यांच्या बळावर आम्ही कोणतीही अटीतटीची लढाई लढायला सज्ज आहोत, हे आम्ही अगदी विनम्र भावाने येथे नमूद करीत आहोत. सत्तेचा माज आम्हाला कधीच नव्हता. कारण शेवटी जनताच सत्ता देत असते व ज्यांना त्या सत्तेचा माज चढतो अशांचा माज उतरवून त्यांना धुळीस मिळविण्याचे कार्यही सार्वभौम जनताच करीत असते. अशा जनतेसमोर आम्ही सदैव नतमस्तक आहोत. 
 
- शिवसेना-भाजप युतीचे काय होणार व कसे होणार, या प्रश्नाने ज्यांना आज ग्रासले आहे त्यांना आम्ही रावसाहेब दानवे यांच्या एका विनम्र विधानाचा दाखला देऊन श्रद्धा व सबुरीचा मंत्र देत आहोत. श्री. दानवे यांनी असे नम्रपणे जाहीर केले आहे की, ‘‘मुंबईसह राज्यात शिवसेनेसोबत युती करण्याबाबत आम्ही अजून सकारात्मक आहोत. शेवटपर्यंत आमचे प्रयत्न सुरू आहेत!’’ दानवे यांच्या तोंडात साखर पडो. दानवेंसारखे लोक राजकारणात आहेत म्हणून बऱ्याच गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. दानवे यांची सकारात्मक आणि आश्वासक भूमिका पाहून ‘युती’वाद्यांना नक्कीच तजेला येईल. दानवे हे सकारात्मक आहेत. त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगातून मार्ग ते काढतील व सगळय़ांचीच वाकडी तोंडे वळवून युतीत हास्य निर्माण करतील. रावसाहेब दानवे यांच्या सकारात्मक भूमिकांनी सध्या महाराष्ट्राच्या समाजमनात खळबळ उडवून दिली आहे. ‘निवडणुकीच्या आदल्या दिवशी दारात आलेली लक्ष्मी परत पाठवू नका. लक्ष्मीदर्शन घ्या’ असे लोकांना पटवून देणे हे तर सकारात्मक सज्जन प्रवृत्तीचेच लक्षण आहे. व ‘नोटाबंदी’वर त्यांनी जनतेला दिलेला हा रामबाण उपाय आहे. दानवे यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. दानवे यांनी कालच सांगितले की, ‘‘लोक हो, चिंता कसली करता? बँकांच्या रांगेत चेंगरून काहो मरता? मैं हूं ना. हजार-पाचशेच्या नोटा मी देतो तुम्हाला बदलून!’’ नोटाबंदीवर इतके जालीम मलम लोकांना कोणीच लावले नसेल. दानवे यांची ही सकारात्मक सक्रियताच भाजपला दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवीत राहील. म्हणूनच युतीबाबत ते आश्वासक, सकारात्मक व इतर बरेच काही असल्याबद्दल आमचीही चिंता मिटली आहे. 
 
- राजकारणात, समाजकारणात खूप माणसे भेटतात. वाऱयाच्या झुळकाप्रमाणे येतात आणि जातात. पण काही माणसे अशी असतात जी समाजाला जीवनाचा अर्थ सांगतात. सकारात्मक दृष्टी देऊन जीवनात गोडवा आणतात. दानवे हे त्यातलेच दिसतात. दानवे यांचे वय ‘साठ’ असावे व त्यामुळेच त्यांना हे सकारात्मक विचार सुचत आहेत. आम्ही दानवे यांचे आभार मानतो. दानवे यांनी युतीला सकारात्मक मार्ग दाखवले! त्यांचे अभिनंदन.