शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

ठाण्यात सात महिन्यांत १८२ बालमृत्यू

By admin | Published: January 10, 2017 4:35 AM

आदिवासी, दुर्गम भागातील कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना जिल्ह्यात सुरू आहेत. तरीदेखील अवघ्या सात महिन्यांत १८२ बालमृत्यू झाल्याची नोंद आढळून

सुरेश लोखंडे/ ठाणेआदिवासी, दुर्गम भागातील कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना जिल्ह्यात सुरू आहेत. तरीदेखील अवघ्या सात महिन्यांत १८२ बालमृत्यू झाल्याची नोंद आढळून आली आहे. यामध्ये एक ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांचा समावेश आहे. मातामृत्यू, बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करून उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, प्राप्त झालेल्या बालमृत्यूंची संख्या पाहता त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचे प्रयत्न काही सामाजिक संघटनांकडून केले जात आहेत. जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांत २०१६च्या एप्रिल ते नोव्हेंबर या सात महिन्यांत ही बालके दगावली आहेत. यामध्ये एक ते सहा वर्षाच्या २० बालकांचा समावेश आहे. तर, ७१ बालके एक वर्षापर्यंतची आहेत आणि शून्य ते सहा वर्षापर्यंतची ९१ बालके दगावलेली आहेत. दगावलेल्या बालकांमध्ये कमी वजनाची, जन्मत: व्यंग, हृदयविकार, हायपोथर्मिया, अ‍ॅस्पिरेशान न्यूमोनिया, अ‍ॅस्पेक्शिया, श्वासावरोध, हेमॅटीमिसिस, सेप्टीसिमिया, अतिज्वर, ज्वर झटके, सर्पदंश, अननोन बाइट, नेफियटीक सिंड्रोम, एचआयव्ही बाधित, न्यूमोनिया आणि इतर आजारांस बळी  पडून हे बालमृत्यू झाल्याचे गाभा समितीच्या बैठकीत उघड झाले. (प्रतिनिधी)