शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

‘त्या’ बछड्यांचा थंडीमुळे मृत्यू

By admin | Published: April 02, 2016 1:24 AM

चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव पाथरी वनक्षेत्रातील वाघाच्या चार बछड्यांचा झालेला मृत्यू हा भुकेमुळे आणि तीव्र थंडीमुळे झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाल्याचे वनमंत्री सुधीर

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव पाथरी वनक्षेत्रातील वाघाच्या चार बछड्यांचा झालेला मृत्यू हा भुकेमुळे आणि तीव्र थंडीमुळे झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे संदीप बाजोरिया यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, या बछड्यांचा मृत्यू थंडी आणि भुकेमुळे झाला. मात्र मृत्यूची अन्य काही कारणे असू शकतात का, याचा तपास चालू आहे. या बछड्यांच्या मातेचाही शोध सुरू असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. वाघिणीची शिकार झाली का? अशी शंका सदस्यांनी उपस्थित केली. मात्र, वाघिणीची शिकार झाल्याच्या निष्कर्षापर्यंत अजून वनविभाग पोहचलेला नाही. वनविभागातर्फे शिकारीवर नियंत्रण करण्यासाठी पेंच, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष व्याघ्र संरक्षण दलामार्फत कोअर व बफर क्षेत्राच्या संवेदनशील भागात नियमित गस्त घातली जात आहे. महत्त्वाच्या ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील बिनतारी संदेश यंत्रणा २४ तास कार्यरत असून कॅमेरा ट्रॅप लावून वाघ, बिबट्यांवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)