शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

हजारो बीअर बार बंद, तरीही उत्पन्नात वाढ!

By admin | Published: July 11, 2017 6:15 AM

दारू दुकाने बंद झाली असली तरी राज्य शासनाचे उत्पादन शुल्कापासूनचे उत्पन्न कमी न होता वाढल्याची बाब समोर आली आहे.

यदु जोशी। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गालगतचे बीअर बार आणि दारू दुकाने बंद झाली असली तरी राज्य शासनाचे उत्पादन शुल्कापासूनचे उत्पन्न कमी न होता वाढल्याची बाब समोर आली आहे. २०१६मध्ये ही बंदी नसताना एप्रिल ते जून या तीन महिन्यांत उत्पादन शुल्कापोटी जेवढे उत्पन्न राज्याच्या तिजोरीत जमा झाले त्याहून सहा टक्के जादा उत्पन्न यंदाच्या या तीन महिन्यांमध्ये झाले आहे. गेल्या वर्षी या काळात २६४० कोटी रुपये जमा झाले होते. यंदाच्या तीन महिन्यांत हा आकडा २८०० कोटी रुपयांवर गेला. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील १५,५०० बीअर बार आणि दारू दुकाने बंद झाली. त्यामुळे उत्पादन शुल्क वर्षाकाठी आठएक हजार कोटींनी कमी होईल, असा दावा केला जात होता. मात्र तीन महिन्यांतील आकडेवारी या दाव्याला छेद देणारी आहे. उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उत्पन्नात वाढ झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. २०१६-१७मध्ये राज्याला १२ हजार ४०० कोटींचे उत्पादन शुल्क मिळाले होते. त्यात वाढ होऊन ते २०१७-१८ या आर्थिक वर्षात १४ हजार कोटींवर जाईल, असा अंदाज होता. तथापि, न्यायालयाच्या निर्णयाने गणित बिघडून ते जवळपास ६० टक्क्यांनी कमी होईल, अशी भीती व्यक्त होत होती. >आज होणार फैसलाराज्य वा राष्ट्रीय महामार्गांचे हस्तांतरण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे करून हायवे लगतची दुकाने पुन्हा सुरू करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. हे हस्तांतरण अवैध ठरविण्यासंदर्भातील याचिकेवर उद्या, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. >तळीरामांनी शोधला ‘मार्ग’न्यायालयीन निर्णयामुळे एका गावातील चारपैकी दोन दुकाने बंद झाली असली तरी तळीरामांनी आपला मोर्चा सुरू असलेल्या दुकानांकडे वळविला आहे. सुरू असलेल्या बार/दुकानांवर प्रचंड गर्दी उसळते. त्यामुळे विक्री कमी झालेली नसावी, असे उत्पादन शुल्क विभागाच्या सूत्रांनी सांगितले. उत्पादनही वाढले!उत्पादन शुल्काची वसुली ही दारू उत्पादक कंपन्यांकडून केली जाते. दारू दुकाने बंद झाल्याचा विपरीत परिणाम उत्पादनावरदेखील होईल, असे म्हटले जात होते. तथापि, तेही कमी झाल्याचे दिसत नाही. राज्यातील १५ हजार दारूविक्री दुकाने बंद असतानाही उत्पादित दारूची विक्री कुठे झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.