शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

गारगाई-पिंजाळ धरण प्रकल्पात हजारो विस्थापित

By admin | Published: April 15, 2017 1:37 AM

मुंबईची तहान भागविण्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या महत्त्वाकांक्षी गारगाई आणि पिंजाळ धरण प्रकल्पात सुमारे एक हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत.

मुंबई : मुंबईची तहान भागविण्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या महत्त्वाकांक्षी गारगाई आणि पिंजाळ धरण प्रकल्पात सुमारे एक हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनशे कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पबाधितांचे जीवन रूळावर आणण्यात येणार आहे.गारगाई प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात वाडा येथील वैतरणा नदीवर धरण बांधण्यात येणार आहे. तर जवाहर येथील पिंजाळ नदीवर पिंजाळ धरण उभे राहणार आहे. मात्र या प्रकल्पाची वाट मोकळी करण्यासाठी महापालिकेला आधी येथील विस्थापितांचे पुनर्वसन प्राधान्याने करावे लागणार आहे. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आराखडा ठेवला आहे. त्यानुसार गारगाई धरण प्रकल्पामुळे सहा गावांतील १९१ कुटुंब तर पिंजाळ प्रकल्पात ११ गावांतील ८६५ कुटुंब विस्थापित होणार आहेत. गारगाई प्रकल्पातील विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी ५६ कोटी तर पिंजाळ प्रकल्पात पाण्याखाली जाणाऱ्या गावांच्या पुनर्वसनासाठी २४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

- मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. तर पाण्याची दररोजची मागणी ४ हजार ३०० दशलक्ष लीटर्स आहे.- गारगाई प्रकल्पातून अतिरिक्त ४४० दशलक्ष लीटर्स प्रती दिन आणि पिंजाळ प्रकल्पातून ८६५ दशलक्ष लीटर्सने दररोजचा जलसाठा वाढणार आहे.- गारगाई प्रकल्पात विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी ५४ कोटी आणि पिंजाळ प्रकल्पात २४६ कोटी बेघर होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनाठी खर्च केले जाणार आहेत.- या गावांबरोबरच ७५० हेक्टर्स तानसा वन जीवनही विस्थापित होणार आहे.- वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येथे आहे.- या प्रकल्पाच्या सल्ल्यासाठी ४ कोटी ६४ लाख रुपये महापालिका मोजणार आहे.