शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

तीन शेतकऱ्यांच्या विदर्भात आत्महत्या

By admin | Published: September 11, 2016 4:03 AM

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

अमरावती / यवतमाळ / भंडारा : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.अमरावती येथील नया अकोला गावात संदीप पांडुरंग कांडलकर (३३) या युवा शेतकऱ्याने शनिवारी दुपारी विषप्राशन करून आत्महत्या केली. संदीप याच्याकडे सहा एकर शेती होती. पिकांसाठी त्याने स्टेट बँकेकडून दीड लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, यंदाही पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे पीक नष्ट झाले. पुन्हा कर्ज कोणाकडे मागायचे, या विवंचनेत त्याने विषप्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील महंमदपूर येथे प्रभाकर जगन्नाथ मुंडले (५०) यांनी शुक्रवारी विषप्राशन करून आत्महत्या केली. डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे या चिंतेतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे अनिल रिनायत (३७) शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्ज फेडण्याच्या विंवचनेतून बुधवारी ओहोळात उडी घेऊन आत्महत्या केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)