शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
3
"वृद्धांना तरुण करू"; टाईम मशीनच्या जाळ्यात अडकले हजारो लोक, जोडप्याकडून कोट्यवधींचा गंडा
4
Amitabh Bachchan : "मी दिवसाला २०० सिगारेट ओढायचो, पण आता..."; 'असं' बदललं अमिताभ बच्चन यांचं आयुष्य
5
IPO असावा तर असा, लिस्टिंगच्या दिवशीच पैसा दुप्पट; आता Shares खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
7
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
8
दिवसभर भीक मागायचे अन् रात्री हॉटेलात मुक्काम करायचे; २२ भिकाऱ्यांना पोलिसांनी पकडले
9
२ लाख कॅश, ३०० ग्रॅम सोनं, ११ किलो चांदी, १३ प्लॉट...; IAS अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड
10
Iran Isreal Tension : इस्त्रायलचा मारा सहन करू शकेल का इराण; जाणून घ्या देशाच्या अर्थव्यवस्थेची काय आहे स्थिती?
11
"आज कुछ तुफानी करते है!" Martin Guptill चा कडक सिक्सर; फुटल्या कॉमेंट्री बॉक्सच्या काचा!
12
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
13
२००० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार काँग्रेसचा माजी पदाधिकारी; कोकेन प्रकरणात मोठा खुलासा
14
Bigg boss 18 मध्ये येणार 'तारक मेहता...'चा सोढी? महिनाभर बेपत्ता झालेल्या गुरुचरण सिंहचं नाव चर्चेत
15
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
16
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
17
तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट
18
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
19
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची माहिती समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
20
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...

पत्रकारांवर हल्ला केल्यास तीन वर्षे कैद

By admin | Published: April 08, 2017 5:05 AM

पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला आता तीन वर्षांपर्यंतची कैदेची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे.

मुंबई : पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला आता तीन वर्षांपर्यंतची कैदेची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असणार आहे. मात्र, खोटी तक्रार करणाऱ्या पत्रकारालादेखील तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांचा दंड होणार आहे. यासंबंधीचे विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मांडले. विधानसभा आणि विधान परिषदेनेही हे विधेयक एकमताने मंजूर केले. राज्यातील पत्रकारांवर सातत्याने होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांनी गेली अनेक वर्षे लावून धरली होती. पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला. शिवाय भाजपा-शिवसेनेच्या सदस्यांनी कोणतीही चर्चा न करता एकमताने विधेयकास मंजुरी दिली. पत्रकारांवरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा मानला जाईल. तो प्रथमश्रेणी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयाकडून चौकशी करण्यायोग्य असेल. या कायद्यानुसार केवळ पत्रकारच नव्हे, तर प्रसारमाध्यम कार्यालय, छापखाना यांनाही संरक्षण मिळाले आहे. म्हणजेच वृत्तपत्र अथवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या कार्यालयावरील, छापखान्यावरील हल्लादेखील या कायद्याअंतर्गत गुन्हा असेल. संपादक, वृत्तसंपादक, उपसंपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, व्यंगचित्रकार, वृत्तछायाचित्रकार, दूरचित्रवाणी कॅमेरामन, अग्रलेखक, प्रसंगविशेष लेखक, संहिता तपासनीस, मुद्रितशोधक यांना हे संरक्षण मिळणार आहे. (विशेष प्रतिनिधी)>खोटी तक्रार करणाऱ्या पत्रकारालाही शिक्षाखोटी तक्रार करून एखाद्या प्रकरणात कोणाला गोवण्याचा प्रयत्न पत्रकाराच्या अंगलट येणार आहे. कारण, त्याची तक्रार खोटी होती असे लक्षात आले तर त्यालाही तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकेल. अशा पत्रकारास सर्व प्रकारच्या शासकीय लाभापासून कायमचे वंचित करण्यात येईल.