शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

नरेंद्र मोदींपेक्षा अडवाणी चांगले म्हणण्याची वेळ : जयराम रमेश

By admin | Published: May 26, 2017 3:53 PM

केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली.यानिमित्त "काँग्रेसच्याच योजना नाव बदलून पुन्हा जाहीर करण्याशिवाय मोदी सरकारने काहीही केलेले नाही", अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

 ऑनलाइन लोकमत

पुणे, दि.26  -  ""काँग्रेसचा यापूर्वीही पराभव झाला होता.  पण आम्ही पुन्हा सत्तेवर आलो.  त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे उदारमतवादी सभ्य प्रतिस्पर्धी होते.  आता मात्र मोदी यांच्यापेक्षा अडवाणी चांगले असे म्हणण्याची वेळ आली आहे.  मोदी यांना कशाचेही विधीनिषेध नाही.  मेरा भाषण मेरा शासन असा त्यांचा खाक्या आहे, अशी टीका माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केली. 
 
पुणे शहर काँग्रेसने मोदी सरकारच्या तीन वर्षांच्या कारर्कीदीचा पंचनामा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जयराम बोलत होते. काँग्रेस त्यांचा सामना करण्यात कमी पडत आहे, असेही रमेश यांनी यावेळी मान्य केले. 
 
पुढे ते असेही म्हणाले की, ""सगळे मंत्री प्रभावहीन आहेत. सामाजिक,आर्थिक, राजकीय अशा सर्व आघाड्यांवर देशाची पिछेहाट आहे. याला जबाबदार मोदीच आहेत. सांगतात एक व करतात एक अशी त्यांची निती आहे. देशाची वाटचाल लोकतंत्रकडून एकतंत्रकडे चालली आहे. मागील तीन वर्षात काँग्रेसच्याच योजना नाव बदलून पुन्हा जाहीर करण्याशिवाय मोदी सरकारने काहीही केलेले नाही"". 
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पर्यावरणाचा सत्यानाश केला आहे. आपण पर्यावरण संरक्षण मंत्री आहोत हे विसरून ते रोज किती प्रकल्प क्लिअर केले ते सांगत फिरत असतात, अशी टीकाही रमेश यांनी केली.