शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
2
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
3
सर्व विक्रम उद्ध्वस्त करत सोनं 81000 हजार पार; GST सह चांदी 102125 रुपयांवर, पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
अजित पवारांनी पहिल्या यादीत नवाब मलिकांचे नाव टाळले? भाजपचा विरोध की अन्य कारण...
5
Corona Virus : कोरोनातून बरं झालेल्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा दुप्पट धोका?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा
6
कागलचा 'श्रावणबाळ' पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, हसन मुश्रीफ यांना उमेदवारी
7
NCP Vidhan Sabha Candidate List : काँग्रेसनं नाकारलं, अजित पवारांनी स्वीकारलं! ते दोन विद्ममान आमदार कोण?
8
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
9
Airtel Sunil Mittal Birthday : एकेकाळी बनवायचे सायकलचे पार्ट्स, अशी उभी केली Airtel; कसा होत सुनील मित्तल यांचा प्रवास
10
PAK vs ENG FINAL : रावळपिंडी कसोटीसाठी पाकिस्तानने अवलंबवला भारताचा फॉर्म्युला; इंग्लंडची कोंडी!
11
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
12
“अंतरवाली सराटी श्रद्धास्थान, बीडमधील सर्व जागा निवडून आणू”; बजरंग सोनावणे जरांगेंना भेटले
13
"...अन् शाहरुखने दिले ५५० रुपये", अमेय वाघने सांगितला किस्सा; किंग खानसमोरच रडला
14
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
16
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
17
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
18
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
19
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
20
Amit Thackeray - महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं

साईबाबांवरही आली ‘श्रद्धा व सबुरी’ची वेळ !

By admin | Published: June 26, 2014 12:55 AM

द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी शिर्डीच्या साईबाबांवर बेछूट मुक्ताफळे उधळल्याने उत्तरेत कट्टर हिंदू आणि मुस्लीम धर्माधिका:यांमध्ये वैचारिक धुनी पेटली आहे.

रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी शिर्डीच्या साईबाबांवर बेछूट मुक्ताफळे  उधळल्याने उत्तरेत कट्टर हिंदू आणि मुस्लीम धर्माधिका:यांमध्ये वैचारिक धुनी पेटली आहे. आखाडय़ांचे प्रस्थ असलेल्या वाराणशी, अयोध्या, हरिद्वार, लखनौ, अलाहाबाद भागात महंत हमरीतुमरीवरही आले आहेत. मुसलमानांशी साईबाबांना जोडू नका, अशी थेट भूमिका  बरेली आणि देवबंद उलेमांनी घेतली आहे. त्यामुळे एकतेचे प्रतीक मानल्या जाणा:या या फकिराला आता ‘श्रद्धा व सबुरी’ या स्वत:च्याच तत्त्वातून भक्तीचा नवमार्ग सांगावा लागणार आहे, असे दिसते. 
साईबाबा देव नाहीत, मंदिर उभारून पूजा करणोही गैर, असे धार्मिक तेढ निर्माण करणारे मत शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी व्यक्त केले. त्यानंतर एकच गहजब साईभक्तांमध्ये निर्माण झाला. शिर्डीमध्ये लागलीच पडसाद उमटले. शिर्डी, चंदीगढ  व इंदूरमध्ये प्रकरण पोलिसात गेले.  वाराणशी व बैतुलमध्ये शंकराचार्याच्या प्रतिमांचे दहन झाले. आता धर्ममरतडांमध्ये वाक्युद्ध रंगले. 
हरिद्वारच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास यांनी शंकराचार्यावर खरपूस टीका केली. स्वरूपानंद यांची बुद्धी नाठी झाली आहे. त्यांचे फक्त वय वाढले. त्यांनी असे विधान करायला नको होते, गरजही नव्हती. साईबाबा मानवतेचे दूत होते. त्यांनी मानवजातीचे भलेच केले, असे ते म्हणतात. त्याचवेळी परिषदेचे प्रवक्ते बाबा हटयोगी यांनी शंकराचार्याची बाजू घेतली. जे शंकराचार्याच्या विरोधात बोलतात ते ‘पाखंडी’ आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 
विश्व सनातन धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्रनाथ अवधूत यांनी साईबाबा महान संत होऊ शकतील, पण देव नाही. शंकराचार्य खरे बोलत आहेत, असे सांगितले.
 
आता वाद करणो अयोग्य
च्बरेलीच्या नबिरे आला हजरत मौलाना मनांन रजा खान उर्फ मननी मिया यांनी म्हटले की, साईबाबांची पूजा खूप वषार्पासून होते, आता अचानक या विषयावर विवाद करणो अयोग्य आहे. त्यांनी चर्चेत यावे म्हणून हा विषय छेडला.
च्ऑल इंडिया जमात रजा - ए - मुस्तफाचे सरचिटणीस म्हणाले की, साईबाबांमध्ये मुसलमानांना काहीही स्वारस्य नाही, ते हिंदूंचे नेता होते. ऑल इंडिया सुफी कौन्सिलचे अध्यक्ष सुफी रईस मियां कादरी म्हणतात की, साईबाबा फकीर होते. कोणताच  मनुष्य ईश्वर असू शकत नाही. त्यावरून निर्माण झालेला विवाद दोन धर्मामध्ये अकारण कटुता निर्माण करण्याचा प्रय} होत आह़े