शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

बालाश्रम, वृद्धाश्रमांवर उपासमारीची वेळ

By admin | Published: January 22, 2016 1:56 AM

केंद्र शासनाकडून कल्याणकारी योजनेअंतर्गत सामाजिक संस्था, शासकीय वसतिगृह, वृद्धाश्रम, बालाश्रमांना पुरवठा करण्यात येणारे धान्य आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले आहे

पुणे : केंद्र शासनाकडून कल्याणकारी योजनेअंतर्गत सामाजिक संस्था, शासकीय वसतिगृह, वृद्धाश्रम, बालाश्रमांना पुरवठा करण्यात येणारे धान्य आॅक्टोबरपासून बंद करण्यात आले आहे. यामुळे शहरातील सुमारे २३ सामाजिक संस्थांच्या वसतिगृहातील मुले, वृद्ध व्यक्ती, लहान मुलांना दोन वेळचे अन्न देण्यासाठी खासगी व्यक्तींकडे हात पसरून ‘कोणी धान्य देता का धान्य’ म्हण्याची वेळ आली आहे.शासनाच्या वतीने कल्याणकारी योजनेअंतर्गत शहर आणि जिल्ह्यातील सामाजिक संस्था, वसतिगृह, वृद्धाश्रम, कारागृह, बालाश्रम, आश्रमशाळांना दर महिन्याला रेशनिंगवर मिळणारे धान्य उपलब्ध करून दिले जाते. यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने धान्याची मागणी असणाऱ्या संस्थांना रेशनकार्डप्रमाणे स्वतंत्र ‘अस्थापना कार्ड’ उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये संस्था, वसतिगृहात असलेल्या मुले, व्यक्तींना एका व्यक्तीमागे पाच किलो गहू व तांदूळ उपलब्ध करून दिले जाते. हे धान्य रेशनिंगवर मिळणाऱ्या दरामध्येच म्हणजे २ रुपये किलो गहू आणि ३ रुपये किलो तांदूळ या दराने उपलब्ध करून दिले जाते.यासाठी राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याकडे कल्याणकारी योजनेअंतर्गत किती धान्याची मागणी आहे याचा प्रस्ताव मागविला जातो. त्यानंतर राज्य शासन हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवते आणि केंद्राकडून मागणीप्रमाणे धान्य उपलब्ध करून दिले जाते. परंतु राज्य शासनाने आॅक्टोबर महिन्यापासून असा प्रस्तावच केंद्राकडे पाठविलेला नसल्याने धान्य उपलब्ध करून दिलेले नाही. शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या वतीने पुणे शहरातील सुमारे २३ संस्थांना या योजनेअंतर्गत धान्य उपलब्ध करून दिले जाते. गेल्या काही महिन्यांपासून या संस्था पुरवठा विभागाकडे दररोज हेलपाटे मारत आहेत. परंतु शासनाकडून धान्यच आले नसल्याने आम्ही तुम्हाला धान्य उपलब्ध करून देऊ शकत नाही, असे उत्तर ऐकावे लागत आहे. या संस्थांना आॅक्टोबर महिन्यापासून धान्य न मिळाल्याने संस्थेमधील मुले, व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली आहे.तीन रुपये किलोचा तांदूळ २५ रुपये किलोने घेण्याची वेळहमाल पंचायतीच्या वतीने ‘कष्टकऱ्याची भाकरी’ नावाने गोरगरिबांसाठी स्वस्तात जेवण उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शासनाकडून २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून दिले जाते. शासनाकडून आॅगस्टमध्ये ३५ क्विंटल गहू व ९० क्व्ािंटल तांदूळ उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर धान्यच आले नाही, तर कोठून देणार, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात येते. परंतु यामुळे तीन रुपये किलोचे तांदूळ २५ रुपये दराने खरेदीची वेळ आली असल्याचे, दिलीप मानकर यांनी सांगितले.धान्य न मिळाल्याने अनेक अडचणी पुणे शहरातील विद्यार्थी सहायक समितीलादेखील शासनाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत धान्य उपलब्ध करून दिले जाते. वसतिगृहात सुमारे ७००पेक्षा अधिक विद्यार्थी आहेत. खुल्या बाजारातून धान्य घेणे समितीला परवडणारे नाही. यामुळे शासनाने धान्य उपलब्ध करून द्यावे, यासाठी पुरवठा विभागाला अर्ज दिला आहे. - प्रभाकर पाटील, संचालक विद्यार्थी सहायक समिती