शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

वेळ अतिशय भयंकर आहे, तो कोणाला माफ करत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2016 1:20 AM

मनुष्य आपल्या शरीरावर अतिशय अभिमान करतो की माझे शरीर अतिशय कणखर आहे.

पुणे- मनुष्य आपल्या शरीरावर अतिशय अभिमान करतो की माझे शरीर अतिशय कणखर आहे. खूप सुंदर आहे. परंतु भगवान महवीर असे म्हणतात, तुम्ही ज्या शरीराला सुंदर आणि मजबूत समजता ते अतिशय कमजोर आहे. एवढ्या मोठ्या शरीराला एक डास चावला की आपण तळमळत उठतो. पायामध्ये छोटासा काटा जरी टोचला तरी वेदनेने आपण घायाळ होतो. तर मग आपण कोणत्या गोष्टीसाठी या शरीराबद्दल अभिमान बाळगतो. एक छोटीशी लाल मुंगी संपूर्ण शरीराला हालवून टाकते. मग आपण या देहावर अभिमान करू नये. जे जीवन जे मिळाले आहे त्याचा क्षणमात्र भरवसा नाही. आता आपण बसलेलो आहोत आणि पुढच्या क्षणी आपेल अस्तित्व असेल की नाही हे सांगता येत नाही. म्हणून परमात्मा असे म्हणतात, की हे देहरूपी शरीर दुर्बल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ अतिशय भयंकर आहे. वेळेची मार कधी कशी पडेल हे सांगता येत नाही. वेळेपुढे रथी-महारथी टिकू शकले नाहीत. तर मग आम्ही अभिमानी का असावे? जेव्हा आम्ही आजारी पडतो तेव्हा आपल्याला सहाय्य करणारे कोणी नसते. जेव्हा आपले हातपाय थकतील, शरीर वृद्धापकाळाने क्षीण होईल तेव्हा आपली सेवा करणारे मिळणे खूप कठीण आहे. ज्या कुटुंबावर आपल्याला खूप अभिमान असतो ते सुद्धा साथ देत नाहीत. मग आपण कोणासाठी व कशासाठी एवढा अभिमान बाळगून असतो. या भूतलावर बऱ्याच अशा व्यक्ती आहेत ज्यांना असे वाटते की आमच्याजवळ पैसा आहे. तर आमच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. परंतु परमात्मा असे म्हणतात, की खुपशा अशा समस्या आहेत की ज्या धनाने मिटू शकत नाहीत. जर एखादे असे आजारपण आले की कितीही पैसा खर्च केला तरी तो आजार बरा होऊ शकत नाही. म्हणून परमात्म्याने मनुष्याचा अभिमान नष्ट करण्याचा प्रयत्न करावा असे म्हटले आहे. गंध, रुप, स्पर्श, वर्ण आदी गोष्टी मनुष्याला लगेचच आकर्षित करतात आणि मनुष्य त्याच्याकडे जलद गतीने आकर्षित होतो आणि फसतो. एखादे गाणे वाजू लागले की आपण त्याकडे आकर्षित होतो किंवा चांगला सुंगध आला तरी आपले लक्ष विचलित होते. जिथे आपल्याला सूट (डिस्काऊंट) दिसेल त्याकडे आपण लगेच धावतो आणि आपली फसवणूक होते. मनुष्य असा विचार करतो की समोरचा आपल्या एका गोष्टीवर दुसरी गोष्ट फुकट देत आहे परंतु हे खरे नसते. तर समोरची त्याच किंमतीत दोन्ही वस्तूंच्या पैशांची वसुली करत असतो. अशा मोहात अडकणे म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेणेच होय. - प. पू. डॉ. समकित मुनीजी म. सा.