शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
2
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
3
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
4
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
5
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
6
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
7
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
8
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
9
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
10
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
11
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
12
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
13
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
14
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
15
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
16
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
17
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
18
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
19
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
20
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 

तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांचा ‘टिवटिवाट’

By admin | Published: June 27, 2017 1:50 PM

तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांनी ट्विटरचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे.

ऑनलाइन लोकमत/ संतोष हिरेमठ

औरंगाबाद, दि. 27-  रेल्वेस्टेशनवरील प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृह, बोगींमध्ये अस्वच्छता आणि इतर सोयी-सुविधांच्या अभावामुळे रेल्वे प्रवास अवघड होतो. काही वर्षांपूर्वी या समस्यांच्या तक्रारींसाठी कागदोपत्री पत्रव्यवहार करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात बराच वेळ जात असल्याने शक्यतो प्रवासी त्या भानगडीत पडत नव्हते. परंतु गेल्या काही वर्षात तक्रारींसाठी रेल्वे प्रवाशांनी ट्विटरचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. त्यातून महिनो-न्-महिने न सुटणाऱ्या समस्या काही वेळेत निकाली लागण्यास मदत होत आहे. 
 
सोशल मीडियाचा वापर आज केवळ स्वत:ची छायाचित्रे टाकण्या पुरताच राहिलेला नाही. या माध्यमाचा वापर करून सकारात्मक बदल घडविला जात आहे. काही महिन्यांपूर्वी निवडणुकांच्या निकालाने सोशल मीडियाचे महत्त्व समोर आले होते. त्याप्रमाणे आता प्रत्येक क्षेत्रातही त्याचा वापर वाढत आहे. रेल्वे प्रवासीही त्यामध्ये मागे नाही. सर्वसामान्यांना किफायतशीर प्रवासासाठी रेल्वेचा मोठा आधार मिळतो. दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवासादरम्यान अनेकदा गैरसोयींना सामोरे जावे लागते. अशावेळी सोशल मीडियामुळे ऐन प्रवासातही या समस्या सहन करण्याऐवजी त्यास वाचा फोडणे शक्य झाले आहे.
 रेल्वे प्रवासात भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ‘ट्विटरची मदत घेण्याकडे अलीकडे प्रवाशांचा कल वाढत आहे. आजघडीला प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करून रेल्वेच्या समस्या अधिकाऱ्यांपासून थेट रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. यातून प्रवाशांच्या अडचणींची तात्काळ दखल घेतली जाते. त्यामुळे समस्या, अडचणी काही वेळेतच मार्गी लागतात. समस्यांबरोबर नवीन रेल्वे सोडणे, बोगी वाढविणे, रेल्वेचा विस्तार करणे अशा विविध मागण्याही टिष्ट्वटरवरून केल्या जात आहे. त्यास रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्रतिदास मिळून त्यासंदर्भातील उत्तर दिले जातात.
 
रेल्वे प्रवाशांना टिष्ट्वटरच्या माध्यमातून कशी मदत मिळाली, याची काही उदाहरणे.
ट्विटनंतर निघाले चोकअप
औरंगाबादेतील रेल्वेस्टेशनवर २८ नोव्हेंबर २०१६ रोजी विश्रामगृहातील अस्वच्छ आणि तुंबलेल्या स्वच्छतागृहाच्या तक्रारीकडे कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशाने या प्रकाराची थेट रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार केली. या तक्रारीची रेल्वे मंत्रालयाने गंभीर दखल घेतल्याने स्थानिक अधिकारी-कर्मचाºयांची चांगलीच धावपळ उडाली. अवघ्या काही वेळत युद्धपातळीवर स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात आली.
 
रेल्वेस्टेशनवर स्वच्छतेकडे दुर्लक्ष
रेल्वेस्टेशनवरील स्वच्छतेकडे सहा महिन्यांपासून दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ८ जून रोजी ट्विटरवरून थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे करण्यात आली. रमेशचंद्रा झा यांनी ट्विटद्वारे ही तक्रार केली. रेल्वेस्टेशनवरील अस्वछतेचे छायाचित्र काढून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विटरवरून पाठविण्यात आले. या तक्रारीची दखल घेत रेल्वेमंत्रालयाने यासंदर्भात ‘दमरे’च्या नांदेड विभागास तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर  औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरील स्वच्छता विभागाला स्वच्छतेची सूचना करण्यात आली.
 
अधिक दराने जेवण
२० जून रोजी तपोवन एक्स्प्रेसमधून रक्षित मेहता हे प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांच्या हाती पेंट्री कारमधील जेवणाचे दरपत्रक लागले. या दरपत्रकातील सर्वच खाद्यपदार्थांचे दर हे नियमित दरापेक्षा अधिक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ‘आयआरसीटीसी’च्या नियमांकडे दुर्लक्ष करून हे दरपत्रक तयार करण्यात आले होते. याविषयी शंका आल्याने त्यांनी ट्विटरवरुन  दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांकडे (डीआरएम) तक्रार केली. डीआरएम ए. के. सिन्हा यांनी तक्रारीची दखल घेत पेंट्री कार चालकावर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.