शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

सवंग लोकप्रियतेसाठी टोलमाफीचा निर्णय

By admin | Published: April 12, 2015 1:33 AM

राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घेतला आहे.अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

नाशिक : राज्य सरकारने टोलमाफीचा निर्णय केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घेतला आहे. त्यातून लोकांना काही फायदा होईल, असे दिसत नाही, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.परदेशात चांगले रस्ते असून त्यासाठी टोल आकारण्यात येतो. मात्र, टोल आकारायचा नाही आणि दुसरीकडे बांधकाम खात्याला रस्ते दुरुस्तीसाठी जादाचा निधीही द्यायचा नाही, असे कसे चालेल. वाहनांना टोलमाफी मिळाल्याने रस्ते खड्डेमय होतील, त्यामुळे वेळ आणि इंधन जादा लागेल. खराब रस्त्यांमुळे शारीरिक आजारही जडतील, असे त्यांनी सांगितले.सर्वात कमी कालावधीत सर्वाधिक विदेशी दौरे करण्याचा विक्रम करणाऱ्या पंतप्रधानांनी परदेशात करार करताना शेती आणि शेतकरी डोळ्यासमोर ठेवावेत. सध्याच्या सरकारचे शेतकरी आणि शेतीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचा आरोपही त्यांनी केला. नैसर्गिक आपत्तीसाठीच्या समितीचा मी गेल्या दहा वर्षांपासून अध्यक्ष होतो. मात्र सध्याच्या समितीच्या बैठकीत नुकसानभरपाईसाठी काही मदत देण्याचा निर्णय झाल्याचे मला अद्याप समजलेले नाही. येत्या अधिवेशनात या प्रश्नावर सरकारशी भांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील मुस्लीम समाज सर्व स्तरातील घटकांशी जुळवून घेत असून, पुरोगामी महाराष्ट्रात एमआयएम सारख्या पक्षांना थारा मिळणार नाही, असे पवार म्हणाले. चितळे समिती आणि अय्यंगार समितीच्या शिफारशीनुसार आधी दाखविण्यात आलेल्या पाण्याचे लाभक्षेत्र आताचे सरकार कमी दाखवित आहे. मात्र पाण्यावरील हक्क आम्ही अजिबात सोडणार नाही, अशी आग्रही भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. (प्रतिनिधी).च्महाराष्ट्र मराठी भाषिक राहण्यासाठी अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्याच महाराष्ट्रात वेगळ्या विदर्भाची भाषा करणे चुकीचे आहे. शेवटी वेगळे राज्य करण्याचा निर्णय नेत्यांनी नव्हे, तर जनतेने घेतला पाहिजे. गोवा राज्य वेगळे करताना जनतेचे मतदान घेतले होते. च्गेल्या काही वर्षांचा विदर्भातील जनतेच्या निवडणुकांमधील कौल पाहता ते वेगळ्या विदर्भाच्या विरोधात असल्याचे आढळून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस वेगळ्या विदर्भाला पाठिंबा देणार नाही. वेगळ्या विदर्भासाठी जनतेनेच निर्णय घ्यायचा असल्याचे पवार यांनी सांगितले.हेरगिरी नव्हे पंडित नेहरूंच्या काळात सुभाषचंद्र बोस यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचे आताचे सरकार बोलत आहे. मात्र मी गृहमंत्री असताना माझ्यावरही पाळत ठेवण्यात येत होती. सार्वजनिक जीवनातील व्यक्ती व कुटुंबीयांच्या हितासाठी व संरक्षणासाठीच त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येते. त्यात काहीही गैर नाही, असे काही नाही. त्यामुळे ही हेरगिरी नव्हे जबाबदारी असल्याचे पवारांनी सांगितले