शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र

By प्रदीप भाकरे | Updated: November 17, 2024 08:32 IST

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिशाभूल केली जात असल्याचे म्हटले.

प्रदीप भाकरे/मनीष तसरेधामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : मी जे बोलतो, तेच पीएम मोदी बोलतात. वर्षभरापासून मी संविधान रक्षण व आरक्षणाची मर्यादा वाढविण्यावर बोलतो आहे. जात जनगणनेवर मी ठाम आहे. मात्र, पीएम मोदी मला आरक्षणविरोधी व संविधानविरोधी ठरवत आहेत. उद्या ते अशीही दिशाभूल करतील की, मी जात जनगणनेच्या विरोधात आहे. जणू मोदींची मेमरी लॉस झाली आहे, अशी घणाघाती टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी येथे शनिवारी केली.

उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी धामणगाव रेल्वे येथे प्रचारसभा घेतली. राहुल गांधी पुढे म्हणाले, ज्या बैठकीत महाराष्ट्रातील सरकार चोरले गेले, त्या बैठकीला अदानी होते. सरकार पाडण्यासाठी आमदारांना कोट्यवधी रुपये दिले गेले. सरकार चोरण्याचा हा असंवैधानिक प्रकार धारावीमुळे घडला. सरकार चोरायचे आहे, धारावीची जमीन हडपवायची आहे, हे संविधानात कुठे लिहिले आहे, असा सवाल करीत, त्या मोबदल्यात धारावीची एक लाख कोटी रुपयांची गरिबांचा जमिनीचा सौदा झाल्याचा आरोप त्यांनी केला. धामणगाव रेल्वे येथे खासदार राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक पथकाने तपासणी केली तथा त्यांची बॅगदेखील तपासण्यात आली.

...हे सामान्यांविरुद्धचे शस्त्र

जीएसटी हे सामान्यांविरुद्धचे शस्त्र असून, तो पैसा उद्योगपतींच्या घशात घातला जातो. त्यातून देशातील २५ अब्जाधीशांचे १६ लाख कोटींचे कर्ज केंद्र सरकारने माफ केले. धारावीची जमीन देत असाल तर तितकीच रक्कम महाराष्ट्रातील जनतेला द्या, अशी मागणी करत ती रक्कम आम्ही देऊ, असे आश्वासन गांधी यांनी दिले.हाती असलेले संविधान दाखवत आमची लढाई संविधान वाचविण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. याशिवाय त्यांनी अर्थसंकल्पाच्या तयारीत ठरावीक अधिकाऱ्यांचा सहभाग, विविध क्षेत्रांतील दलित, आदिवासी, ओबीसींचा नगण्य सहभाग आदींवर भाष्य केले.

दहा लाखांना रोजगार देऊ...

चिमूर : आमचे सरकार पुढील पाच वर्षांत महाराष्ट्रातील १० लाख युवकांना रोजगार देईल. अडीच लाख रिक्त जागा भरू, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी चिमूर येथील सभेत दिली. मोदी सरकारने नोटबंदी केली, चुकीचा जीएसटी लागू केला. ही गरिबांना मारण्याची, लघु व मध्यम उद्याेगांना संपविण्याची हत्यारे आहेत. 

भाजप सत्तेत आहे तोपर्यंत देशात रोजगार निर्माण होऊ शकत नाही अशी टीका त्यांनी केली. शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यातील क्रांतिभूमी चिमूर येथे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी