शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विधानसभेत ‘टॉपर’ झाले ‘काठावर पास’

By admin | Updated: October 23, 2014 04:05 IST

विधानसभा निवडणुकीतील निकालांनी अनेक दिग्गजांची मक्तेदारी मोडीत काढली. गेल्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून येणाऱ्या आमदारांना विजय मिळविताना मोठा संघर्ष करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गौरीशंकर घाळे, मुंबईविधानसभा निवडणुकीतील निकालांनी अनेक दिग्गजांची मक्तेदारी मोडीत काढली. गेल्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून येणाऱ्या आमदारांना विजय मिळविताना मोठा संघर्ष करावा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुंबई शहरातून २००९ साली काँग्रेसचे कालिदास कोळंबकर सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी झाले होते. वडाळ्यातून कोळंबकरांना तब्बल ३०,०३० चे मताधिक्य मिळाले होते. यंदा मात्र कोळंबकरांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. अवघ्या ८०० मतांनी ते कसेबसे विजयी झाले. तर सायन कोळीवाड्यातून १८ हजारांच्या मताधिक्याने विजयी झालेल्या जगन्नाथ शेट्टी यांचा भाजपा उमेदवार कॅ. तमिल सेल्वन यांनी पराभव केला. मुंबादेवीतून काँग्रेस उमेदवार अमिन पटेल यांनी आपली जागा राखली असली तरी त्यांचे मताधिक्य १६ हजारांवरून थेट ८ हजारांवर घसरले. मुंबई उपनगरातील चांदिवली मतदारसंघातून नसीम खान ३३ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. मुंबई उपनगरातील २६ मतदारसंघांतील हे सर्वाधिक मताधिक्य होते. यंदा खान यांनी २९ हजारांचे मताधिक्य राखले असले तरी ते आठव्या स्थानवर आहेत. तर गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावरील अशोक जाधव २४ हजार मतांनी पराभूत झाले. भांडुप येथील मनसे नेता शिशिर शिंदे यांचे मताधिक्य ३०९४३ होते. तिसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय मिळविणारे शिंदे यंदा पराभूत झाले. मालाड पश्चिमेतून काँग्रेसच्या अस्लम शेख यांनी आपली जागा राखली असली तरी २७ हजारांचे मताधिक्य २३०३ वर घसरले. विक्रोळीत मनसेचे मंगेश सांगळे वीस हजारांच्या मताधिक्याने विजयी ठरले होते. यंदा मात्र त्यांना शिवसेनेच्या सुनील राउतांकडून २५ हजारांहून अधिक मतांनी पराभव स्वीकारावा लागला. (प्रतिनिधी)