शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

कोकणसाठी पर्यटन विकास महामंडळ

By admin | Published: April 12, 2016 3:12 AM

कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी ३ हजार ५५ कोटी रुपये खर्च करण्यात

मुंबई : कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल, तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या पर्यटन विकासासाठी ३ हजार ५५ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. कोकणसाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. मुंबई आणि कोकणाविषयीच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘कोकणासाठीच्या स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळाने अधिक प्रभाावीपणे काम करावे, यासाठी मॅरेटाइम बोर्ड आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य घेतले जाईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेचे सहकार्य घेण्यात येणार आहे. त्यासाठी ३ हजार ५५ कोटी रुपयांचा आरखडा या बँकेकडे लवकरच सादर केला जाईल.’ केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन केंद्र योजनेंतर्गत कोकणातील विजयदुर्ग, देवगड, शिराळा, सागरेश्वर, मोचेमाळसह नऊ केंद्रांचा विकास करण्यात येणार असून, त्यासाठी ८२.१७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मेक इन इंडियांतर्गत पर्यटन विकासाचे आठ सामंजस्य करार झाले असून, त्यातील सात प्रकल्प कोकणात येत आहेत. पर्यटन महामंडळांतर्गत एक संचालनालय राज्यात निर्माण केले जाणार आहे. त्या अंतर्गत पर्यटकांना सुविधांची हमी दिली जाईल. रत्नागिरी येथील विमानतळाचा विस्तार केला जाईल आणि ते व्यावसायिक तत्त्वावर चालविले जाईल. कोकणामध्ये आंब्यासह विविध फळांवर प्रक्रिया उद्योग उभारल्यास विशेष सवलती देण्यात येतील. जैन इरिगेशनच्या सहकार्याने आंबा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची घोषणा आधीच झाली आहे. या प्रकल्पासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे सहकार्य घेतले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणांतर्गत पनवेल-इंदापूर हे ८४ किलोमीटरचे काम सुरू झाले आहे. कर्नाळा अभयारण्यात येणाऱ्या २० किलोमीटरच्या पट्ट्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखविला असून, या कामाची निविदाही लवकरच काढली जाईल. इंदापूर-झाराप या ३६६ किलोमीटरपैकी १३४ किलोमीटरचे भूसंपादन पूर्ण झाले असून, त्यासाठीच्या निविदा लवकरच काढण्यात येतील आणि हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)सी वर्ल्ड प्रकल्प आता३५० एकरमध्ये होणारसी वर्ल्ड हा कोकणातील पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरेल, असा प्रकल्प आता ३५० एकरात उभारण्यात येणार आहे. आधी १ हजार ३९० एकरात तो उभारला जाणार होता, पण त्यात भूसंपादनाच्या अनेक अडचणी होत्या. आता ३५० एकराच्या भूसंपादनासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. निवाड्याच्या प्रस्तावाला १५ दिवसांत मंजुरी दिली जाईल. ८ ते १२ महिन्यांत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पासाठी निविदा काढली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.एलिफंटा येथे पर्यटकनिवासस्थान उभारणारअरबी समुद्रात असलेल्या एलिफंटा लेण्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मुक्कामी राहता यावे, यासाठी पर्यटक निवास उभारले जाईल. तेथे मिनी ट्रेन, केबल कारची सुविधा दिली जाईल. विविध वस्तूंची एकाच ठिकाणी विक्री करण्यासाठी रोजगार कुटीर उभारले जाईल. भाऊचा धक्का ते मांडवा अशी जलवाहतूक सुरू केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.