शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पोलिसांच्या रडारवर

By admin | Published: July 18, 2016 3:01 AM

पावसाळ्यामध्ये पर्यटन स्थळांवर रायगड पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.

आविष्कार देसाई,अलिबाग- पावसाळ्यामध्ये पर्यटन स्थळांवर रायगड पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. काही ठिकाणी जाण्यास मज्जावही केला आहे. त्यामुळे वर्षा सहलींसाठी येणाऱ्या पर्यटकांचा चांगलाच हिरमोड होत आहे. पर्यटकांच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठीच हा निर्णय घेतला असल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. शनिवार आणि रविवार या दिवशी येथील पर्यटनस्थळे चांगलीच हाऊसफुल्ल झाली होती.मुंबई-पुण्यातील पर्यटकांना रायगड जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचे भलतेच आकर्षण राहिले आहे. पावसाळ्यात तर येथील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल होतात. अलिबाग हे अंतर कमी असल्याने वनडे पिकनिकसाठी पर्यटकांची पसंती असते. सध्या पावसाचा हंगाम सुरू असल्याने येथील पर्यटन स्थळे चांगलीच बहरली आहेत. अलिबाग येथील तीनवीरा धरणासह अलिबाग तालुक्यातील अलिबाग बीच, नागाव, आक्षी, वरसोली, किहीम, रेवस, मांडवा या समुद्र किनाऱ्यांवर चांगलीच गर्दी पहायला मिळाली. विशेष करून शनिवार आणि रविवार या वीकेंडला तर तुफान गर्दी असते. तशीच आजच्या रविवारीही येथे होती. येथील समुद्र किनारी त्यांनी समुद्रस्नानाचा आनंद घेतला, तर काहींनी धरणातील पाण्यात डुंबून आपली सुटी मनमुराद एन्जॉय केली.काही पर्यटक हे मद्य प्राशन करतात. त्यामुळे ते नकळत खोल समुद्रामध्ये पोहण्यासाठी जातात, परंतु समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते आत ओढले जातात. अशा बऱ्याच पर्यटकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे काही वेळेला अतिउत्साही पर्यटक हुल्लडबाजी करतात. त्यामुळे स्थानिकांबरोबर त्यांचे वाद होतात. तेव्हा पोलिसांची गरज असते.मुंबई येथील अशोक लेलॅण्ड कंपनीतील एक ग्रुप अलिबाग येथे पर्यटनासाठी आला होता. त्यानंतर ते अलिबागमधील पर्यटन आटोपून मुरु ड तालुक्यातील काशिद येथील समुद्रकिनारी गेले तेव्हा त्यांना तेथील पोलिसांनी किनारी जाण्यास मज्जाव केला. समुद्रकिनारी वाईट घटना घडल्या आहेत. तसेच पावसाळ्यात समुद्र काही अंशी खवळलेला असतो. सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी मज्जाव केला असावा, असे पर्यटक वसंत सोनावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.काशिद येथे पोलीस मज्जाव करीत असल्याने अलिबागमधील समुद्र किनारी आम्ही मजा केली. येथील किनारे सुरक्षित असल्याचे पर्यटक जय थॉमस यांनी ‘लोकमत’ला सांगितले.समुद्रकिनारी पोलिसांनी कोणालाही मज्जाव केलेला नाही. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पर्यटकांची गर्दी वाढते. त्यामुळे या दोन दिवशी पेट्रोलिंग वाढविले जाते, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. काही धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखले असेल, तर ते पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केले असेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.>वाहतूक कोंडीएक्स्प्रेस वेवर तेलगळती झाल्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. त्यामुळे लोणावळा, खोपोली परिसरात जाणाऱ्या पर्यटकांना रविवारी दुपारपर्यंत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. >अतिउत्साहामुळे अपघातांची शक्यताअलिबाग येथील तीनवीरा धरण, पळसदरी, आक्षी, नागाव, किहीम, रेवस मांडवा येथील समुद्रकिनारे त्याचप्रमाणे मुरु ड तालुक्यातील मुरु ड, काशिद समुद्र किनारे, कर्जत तालुक्यातील सोनालपाडा धरण, आषाणे, वदप, मोहिली येथील धबधबे त्याचप्रमाणे माथेरान घाटातील धबधबे, माणगाव तालुक्यातील ताम्हाणी घाटातील धबधबे यासह अन्य महत्त्वाच्या पर्यटनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे.पनवेलजवळील आदई धबधबा, कर्नाळा पक्षी अभयारण्य, मुरुडजवळील फणसाड धबधब्यावर सध्या गर्दी होत आहे. श्रीवर्धन, काशिद, मुरुड बीचवरही पर्यटकांची गर्दी होत असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.>आंबोली धरणावर गर्दी नांदगाव : मुरु ड तालुक्यातील खारआंबोली ग्रामपंचायत हद्दीमधील आंबोली धरणावर पर्यटक व स्थानिक नागरिकांची शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी प्रचंड गर्दी पाहावयास मिळत आहे. पाटबंधारे विभागामार्फतया धरणाची निर्मिती करण्यात येऊन सदरील धरण बांधण्यासाठी २९ कोटी रु पये खर्च करण्यात आला आहे.धरणातील ओव्हरफ्लो पाणी एका मोठ्या हौदात जाऊन त्या भागात पर्यटकांना पोहण्याची संधी दिल्याने येथे प्रचंड गर्दी पाहावयास मिळते. लहान मुले व मोठी मंडळी मोठ्या उत्साहात पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिक सुद्धा मोठी गर्दी करत असून याचा आनंद लुटताना दिसत आहेत.धरणांमधून दुबार शेती केली जात असून यातील १५ टक्के पाणीपुरवठा शहरी नागरिकांना होत असतो. सदरील धरण बारमाही तुडुंब ओसंडून वाहत असल्याने ग्रामीण व शहरी नागरिकांना कधीही पाण्याचा तुटवडा भासत नाही.ओव्हरफ्लो पाण्यामधून पर्यटकांना मोठी सुविधा प्राप्त झाल्याने याचा पर्यटन वृद्धीसाठी उपयोग होत आहे. दिवसेंदिवस येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.मुंबई, ठाणे, बोरीवली या भागातील पर्यटक मौजमजा करताना याठिकाणी येत आहेत. धरणे भरल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला.>तीनवीरा धरणावर पर्यटकांची गर्दीकार्लेखिंड : पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना ओढ लागते ती धबधब्यांची. अलिबाग-मुरु ड तालुक्यांना समुद्रकिनारे आहेतच परंतु निसर्गाने सुध्दा त्यात भर टाकली आहे. ठिकठिकाणी पावसाळ्यात धबधबे तयार होतात. पैकी अलिबाग- वडखळ मार्गावर असलेले तीनवीरा धरण व परिसरातील हिरवाई पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. धरणाच्या बंधाऱ्यावरून जवळपास पन्नास ते साठ फुटांवरून पडणारे पाणी फेसाळत खाली येत असल्याने भिजण्याची मजा काही औरच असल्याचे पर्यटक सांगतात. वर्षासहलीसाठी सुरक्षित ठिकाण म्हणूनही याला लोकांची पसंती मिळत आहे. रविवार असल्यामुळे पुणे-मुंबईच्या पर्यटकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.