शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

वाहतूकदारांचा ८ मार्च रोजी संप

By admin | Published: February 28, 2016 2:12 AM

राज्य सरकारने परवाना शुल्कात केलेल्या भरमसाठ वाढीला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, बस, टँकर वाहतूक महासंघाने ८ मार्च रोजी एक दिवसीय संप पुकारला आहे.

मुंबई : राज्य सरकारने परवाना शुल्कात केलेल्या भरमसाठ वाढीला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, बस, टँकर वाहतूक महासंघाने ८ मार्च रोजी एक दिवसीय संप पुकारला आहे. परवाना शुल्काव्यतिरिक्त सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून, घातलेल्या जाचक अटीलाही महासंघाने विरोध दर्शवला आहे. या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांबाबत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास, १५ मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महासंघाचे अध्यक्ष प्रसन्ना पटवर्धन यांनी दिला आहे. राज्य सरकारने परवाना शुल्कामध्ये वाढ केल्याने, राज्यातील पर्यटन व्यवसाय खिळखिळा होण्याची भीती महासंघाचे अध्यक्ष पटवर्धन यांनी व्यक्त केली. सरकारचा हा निर्णय घातकी असल्याने महासंघाने संप पुकारल्याची माहिती पटवर्धन यांनी दिली. शनिवारी या संदर्भात वाशी येथे महासंघाची बैठक झाली.या महासंघटनेमध्ये मुंबई बस मालकसह राज्यातील २३४ संघटनांचा समावेश असल्याने, ८ मार्च रोजी राज्यभरातील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे. या संपामध्ये मुंबईतील सर्व रूटवरील बस, स्कूल बस, पॅकेज बसही सहभागी होणार आहेत, अशी माहिती संघटनेचे मुराद नाईल, के. व्ही. शेट्टी, मलिक पटेल यांनी दिली. परवाना शुल्क वाढ कमी करण्यात यावी, खासगी बस व इतर वाहनांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध करून देणे, तिप्पट प्रवासी कर मागे घ्यावा, खासगी बसेसचे तिकीट बुकिंग काउंटर पुन्हा सुरू करणे, राज्यात एसटीच्या १८ हजार बसेस आहेत, तर खासगी बसेस अडीच लाख आहेत, त्यामुळे खासगी बसेसना त्रास देणे बंद करावे इत्यादी मागण्यांसाठी हा संप पुकारला जात आहे. (प्रतिनिधी).... तर रिक्षाचालकांचे आंदोलनलॉटरीमध्ये विजेते ठरलेल्या रिक्षा चालकांच्या मराठीच्या चाचणीला मुंबई आॅटोरिक्षा मेन्स संघटनेने आक्षेप घेतला आहे. ही अट रद्द करण्यात आली नाही, तर सोमवारपासून आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष शंशाक राव यांनी दिला आहे. या संदर्भात परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांना निवेदन देण्यात आले असून, परिवहन मंत्र्यांसोबत बैठक घेत निर्णय बदलण्यात यावा, अशी मागणी संघटनेकडून केली आहे.आता परवान्यासाठी लॉटरी काढल्यानंतर विजेत्या रिक्षाचालकांची मराठी वाचनाची चाचणी घेण्याचा निर्णय चुकीचा आहे. रिक्षा चालकांचे शिक्षण कमी असल्याने, सरकार आणि परिवहन विभागाने याची जबरदस्ती करू नये. महत्त्वाचे म्हणजे, अमराठी रिक्षा चालकांना परवाना न देण्याचा सरकारचा हा छुपा प्रयत्न आहे. परिणामी, सरकारचा हा कट शिजू देणार नाही, असे शशांक राव यांनी सांगितले.