शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

अमरमहल पुलाच्या दुरुस्तीमुळे वाहतूक ठप्प

By admin | Published: April 11, 2017 1:32 AM

पूर्व द्रुतगती महामार्गावरील अमर महल उड्डाणपुलाचे काही सांधे अचानक तुटल्याने, गेल्या तीन दिवसांपासून या पुलावरून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक पूर्णपणे

मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अमर महल उड्डाणपुलाचे काही सांधे अचानक तुटल्याने, गेल्या तीन दिवसांपासून या पुलावरून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईबाहेर जाणारी वाहतूक विविध मार्गाने वळविण्यात आल्याने, पूर्व द्रुतगती महामार्गासह सायन-पनवेल मार्ग वाहतूककोंडीमुळे ठप्प झाला आहे. याचा फटका मुंबईकरांसह सर्वच प्रवाशांना बसत आहे. तीन दिवसांपूर्वी या पुलाचे पाच सांधे तुटल्याचे एका रहिवाशांच्या लक्षात आले. त्याने तत्काळ ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली. त्यांनी पाहणी करत दुर्घटना टाळण्यासाठी या पुलावरील वाहतूक तत्काळ थांबण्याच्या सूचना वाहतूक विभागाला दिल्या. त्यानुसार, वाहतूक पोलिसांनी ठाण्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक अमर महल उड्डाणपुलाखालून वळवली आहे. मात्र, अमर महल उड्डाणपुलाखालील रस्ता अगदीच लहान असल्याने, सध्या येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. (प्रतिनिधी)पुलाच्या दुरुस्तीला विलंब- ज्या कंपनीने या पुलाची बांधणी केली होती, त्या कंपनीने सध्या पुलांच्या बांधणीचे काम बंद केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने, दुसऱ्या एका कंपनीला या पुलाची माहिती दिली. त्यानुसार, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली असून, त्यावर काय उपाय करता येईल? याबाबत दोन दिवसांत ते बांधकाम विभागाला कळवणार आहेत.तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात टेकू देण्यात आला असून, केवळ ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक पुलावरून सुरू आहे, तर ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.मुंबईतून ठाणे, नाशिक, आग्रा येथे जाण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर केला जातो. परिणामी, येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. आता या समस्येमुळे वाहनांच्या रांगा सायनपर्यंत लागत आहेत.वाहतूक पोलिसांनी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी काही वाहनांना सायन-पनवेल मार्गाचा वापर करण्याची विनंती केली आहे. मात्र, वाहतूक विभागाच्या या निर्णयामुळे या मार्गावरही वाहनांच्या रांगा लागल्या.- तीन दिवसांपूर्वी या पुलाचे पाच सांधे तुटल्याचे एका रहिवाशांच्या लक्षात आले. त्याने तत्काळ ही माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली.त्यांनी पाहणी करत दुर्घटना टाळण्यासाठी या पुलावरील वाहतूक तत्काळ थांबण्याच्या सूचना वाहतूक विभागाला दिल्या.वाहतूककोंडीमुळे नागरिकांना त्रास होणार आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.- राजेंद्र पाटील, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चेंबूर