शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

‘सहली’तून गांजाची तस्करी

By admin | Published: March 23, 2017 3:10 AM

अमलीपदार्थाच्या तस्करीसाठी तस्कर, विक्रेते, ग्राहक नानाविध शक्कल लढविताना दिसतात. अशातच ‘बिहार ते मुंबई विनामूल्य सहली’चा नवा मार्ग

मुंबई : अमलीपदार्थाच्या तस्करीसाठी तस्कर, विक्रेते, ग्राहक नानाविध शक्कल लढविताना दिसतात. अशातच ‘बिहार ते मुंबई विनामूल्य सहली’चा नवा मार्ग तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचे अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) केलेल्या कारवाईतून उघड झाले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे; तर अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.मुंबईत मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती अमलीपदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार अमलीपदार्थविरोधी पथकाचे शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सापळा रचण्यात आला आणि एका गाडीतून आलेल्या सात जणांना ताब्यात घेतले. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. त्यांच्या चौकशीत या विनामूल्य सहलीमागच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. यामध्ये मुंबईचे रहिवासी असलेल्या तस्कर कुमार अहमद (४०), रे रोड येथील टॅक्सीचालक मोहम्मद आरीफ (२९), मुन्ना कुमार (३४), मुकेश सिंग यांच्यासह बिहारचे कुटुंब पप्पू सिंग, पत्नी रिंकू सिंग यांच्यासह १५ वर्षांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत तब्बल ११० किलो गांजा जप्त केला आहे. अहमद हा यामागील मुख्य सूत्रधार आहे. त्याचे आंतरराज्यीय जाळे पसरलेले आहे. तीन वर्षांपूर्वी त्याला घाटकोपर पोलिसांनी गांजा तस्करीप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याने ही अनोखी शक्कल लढविली. मुळात प्रवासादरम्यान एखाद्या कुटुंबावर पोलिसांना संशय येत नाही. त्यामुळे त्याने बिहार ते मुंबई विनामूल्य सहलीचा मार्ग निवडला. यामध्ये तो बिहारमधील कुटुंबांना मुंबईच्या मोफत प्रवासाची माहिती देत असे. मुंबईचे आकर्षण असलेली मंडळी त्यासाठी तयार होत होती. तो गरजू तसेच लहान मुलांचा समावेश असणारी कुटुंबं हेरायचा. अहमदच्या आदेशाने विविध ठिकाणी विखुरलेले तस्कर कुटुंबाच्या शोधात निघायचे. त्यानुसार एकावेळी सहा ते सात कुटुंब हेरायचे. तेथील चालक, वाहनांची सोय होताच आंध्र प्रदेश, ओडिशा येथील विक्रेत्यांकडून तो हा गांजा मुंबईत पुरवठा करायचा. यात प्रवास करणारे कुटुंब मात्र वाहनात गांजा आहे याबाबत अनभिज्ञ असायचे. त्यांना याची माहिती कळू नये म्हणून प्रवासादरम्यान या रॅकेटमधील मंडळी सतत एअरफ्रेशनरचा मारा करीत असत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सिंग कुटुंबीयांना याची माहिती होती की नाही याबाबत अधिक तपास सुरू असल्याचे अमलीपदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले. या कारवाईपूर्वी या रॅकेटने १५ दिवसांपूर्वी मुंबईत अशाच प्रकारे गांजाची तस्करी केली होती. यापूर्वी या लोकांकडून आणखी किती आणि कुठे गांजाची विक्री करण्यात आली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती लांडे यांनी दिली. (प्रतिनिधी)