शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

मासुंद्यात पायात अडकला कचरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2017 3:21 AM

कचराकुंड्यांची साफसफाई महापालिकेने केली नसल्याने जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ठाणेकरांच्या पायात अडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मासुंदा तलावास लागून असलेल्या कचराकुंड्यांची साफसफाई महापालिकेने केली नसल्याने जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ठाणेकरांच्या पायात अडकला. तुडुंब भरलेल्या कुंड्यांमधील कचऱ्यामुळे तलावाचा फेरफटका मारणाऱ्यांना परिसरातील दुर्गंधीचाही सामना करावा लागला.मासुंदा तलावाच्या संवर्धनासाठी सुमारे एक महिन्यापूर्वी व आज सकाळी मानवी साखळी तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ठाणेकरांनी आजही दिला. यामध्ये ठाणे महापालिकेचादेखील महत्त्वाचा सहभाग होता. मात्र, याच मानवी साखळीत सहभागी झालेले घंटाळीदेवी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनादेखील कचऱ्यांच्या घाणीला तोंड द्यावे लागले. त्यांनी वेळीच कचराकुंड्या, दुर्गंधी पसरवणारा गाळ, झाडांच्या तोडलेल्या फांद्यांचे छायाचित्र काढून महापालिकेचे हे ‘कर्तृत्व’ महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. कचरा एकवेळ नागरिकांनी टाकला असेल, पण कत्तल केलेली झाडे आणि तलावातील गाळ तर नागरिकांनी टाकलेला नाही ना? तो वेळीच उचलून परिसरातील पर्यावरणाचे संतुलन राखणे अपेक्षित आहे. शहराच्या स्वच्छतेबाबत महापालिकेने सर्वांचे सहकार्य व मदत मागितलेली आहे; पण महापालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याचे मोने यांनी सांगितले. >अक्षम्य दुर्लक्ष तलावाभोवतालचे तोडलेली झाडे, गणेशघाटातील दुर्गंधी, काठावर काढलेला गाळ, कचराकुंड्यांतील घाण आदींकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. हे सारे दुर्दैवी असल्याचे मोने यांनी आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले. ठाणे महानगरपालिकेला जागतिक पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येलाही शहर स्वच्छ ठेवण्यात अपयशच आल्याने स्वच्छता अभियान फक्त कागदावर दाखवण्यापुरतेच आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.