शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
2
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
3
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
4
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
5
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
6
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
7
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
8
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
9
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
10
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
11
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
12
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
13
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
14
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
15
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
16
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
17
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
18
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
19
IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी
20
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'

Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 06:22 IST

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway: एमएसआरडीसीकडून उद्घाटनाची तयारी सुरु झाली असून, नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होईल.

मुंबई : समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याची कामे पूर्ण झाली असून आता या रस्त्याच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वेळ मागितली आहे. त्यामुळे मेच्या सुरुवातीला हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येईल. 

समृद्धीचा शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होईल. तसेच हा संपूर्ण ७०१ कि.मी.चा महामार्ग सेवेत दाखल होईल.  

विधानसभा निवडणुकीपूर्वी याचा इगतपुरी ते आमने हा शेवटच्या टप्प्यातील मार्ग खुला केला जाणार होता. मात्र या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या खर्डी येथील पुलाचे काम बाकी होते. 

तसेच समृद्धीचा शेवट होतो, त्या आमने येथून पुढे वडपेला जाण्यासाठीच्या रस्त्याचे काम अपूर्ण होते. त्यावेळी फेब्रुवारीपर्यंत हा रस्ता सुरू करण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले होते. मात्र वडपे येथे नाशिक रस्त्याला जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कनेक्टरचे काम अपूर्ण असल्याने या मुदतीत हा महामार्ग सुरू होऊ शकला नव्हता.  

मुंबई ते आमने प्रवास तूर्त अडथळ्यांचा

सध्या ठाणे-वडपे रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक संथगतीने चालते. समृद्धी महामार्ग सुरू झाला तरी या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे मुंबई ते आमने हा प्रवास तूर्त तरी अडथळ्यांचा राहणार आहे.

उद्घाटनासाठी मागितली वेळ

या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारकडे वेळ मागण्यात आली आहे, अशी माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

सद्य:स्थितीत वडपे येथे नाशिक हायवेला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कनेक्टरच्या एका पुलाचे काम अपूर्ण आहे. ते पूर्ण होण्यास दोन महिने लागतील. तोपर्यंत या भागात वाहतूक अन्य मार्गांनी वळण घेऊन वळविली जाणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

इगतपुरी ते आमने टप्पा लवकरच पूर्ण होणार

समृद्धीचा नागपूर ते शिर्डी हा ५२० कि.मी.चा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये खुला केला होता. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास ८० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.

तर गेल्या वर्षी तिसऱ्या टप्प्यात एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २३ कि.मी.चा मार्ग सुरू केला होता. आता शेवटच्या टप्प्यात ७६ कि.मी.चा इगतपुरी ते आमने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गroad transportरस्ते वाहतूकnagpurनागपूरhighwayमहामार्गMumbaiमुंबई