शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

आरेतील वृक्ष मृत्यूपंथाला...

By admin | Published: April 25, 2016 5:46 AM

पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमधील वृक्षांची कत्तल होत असतानाच, आता येथील वृक्ष पाण्याभावी जळू लागल्याची तक्रार होत आहे आणि जे वृक्ष जिवंत आहेत

मनोहर कुंभेजकर,  

मुंबई- पश्चिम उपनगरातील आरे कॉलनीमधील वृक्षांची कत्तल होत असतानाच, आता येथील वृक्ष पाण्याभावी जळू लागल्याची तक्रार होत आहे आणि जे वृक्ष जिवंत आहेत, त्यांना पाणी देण्यासाठी आरे प्रशासन कूपनलिकेला परवानगी देत नसल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन भुयारी मार्गासाठी आरेमध्ये कारशेड उभारण्याचा वाद पेटला असतानाच, येथील वृक्ष पाण्याविना जळत असल्याचे बजरंग दलाचे कार्यकर्ते बाळू बंगर यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, येथील सुमारे ३ हजार २५० एकरवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत आहे. शिवाय मेट्रो कारशेडच्या नावाखाली येथील वृक्षांचा बळी घेतला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, येथील वृक्षांची कत्तलही होत असून, त्याकडे आरे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.आरे कॉलनीमधील वृक्षांना पाणी देता यावे, म्हणून आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन राऊत हे कूपनलिकेसाठी परवानगी देत नसल्याने, प्रश्न आणखी जटील झाला आहे, असेही बाळू बंगर यांनी सांगितले. यापूर्वी जेव्हा येथील वृक्ष तोडण्यात आले, तेव्हा सामाजिक संस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर पुन्हा झाडांची लागवड करण्यात आली, परंतु सातत्याने असे प्रकार होत असल्याने येथील वनराई कशी टिकून राहणार, असा सवाल बाळू बंगर यांनी केला आहे.आरे कॉलनीमधील वृक्ष पाण्याभावी जळू नयेत, म्हणून बजरंग दलाचे कार्यकर्ते डोक्यावर घागर घेऊन येथील वृक्षांना पाणी घालत आहेत.