शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

रोजगाराअभावी आदिवासीची आत्महत्या

By admin | Published: March 14, 2016 2:27 AM

घरात खायला अन्न्नाचा कण नाही आणि रोजगार हमी योजना असूनही रोजगार मिळत नसल्याने विवंचनेला त्रासून तीन दिवसांपूर्वीच जाळून घेतलेल्या आपटाळे गावातील एका आदिवासीचा मृत्यू झाला

हुसेन मेमन,  जव्हारघरात खायला अन्न्नाचा कण नाही आणि रोजगार हमी योजना असूनही रोजगार मिळत नसल्याने विवंचनेला त्रासून तीन दिवसांपूर्वीच जाळून घेतलेल्या आपटाळे गावातील एका आदिवासीचा मृत्यू झाला आहे. सुरेश निकुळे (३२) असे या आदिवासीचे नाव असून निकुळे कुटुंबाच्या रोजगार हमी योजनेच्या जॉबकार्ड वर २००७-०८ पासून आजपर्यंत कसल्याही रोजगाराची नोंद नसल्याचे आढळून आले आहे.जव्हारपासून (जि़ पालघर) अवघ्या आठ किमीच्या अंतरावर ७०० लोकवस्तीच्या आपटाळे गावातील सुरेश निकुळे (३२) या आदिवासीने १० मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घरात स्वत:ला जाळून घेतले. पत्नीला बाहेर काढून आतून दरवाजा बंद केलेला असल्याने त्यांना वाचविण्यास उशीर झाला व ते ९० टक्के भाजले. मात्र रुग्णालयात न्यायला कसलीच मदत मिळाली नाही. सकाळी अंगणवाडी सेविकेने रु ग्णावाहीकेला फोन केल्यावर त्यांना उपचारासाठी जव्हार कुटीर रु ग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे पत्नी वंदना निकुळे यांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी आणि तीन मुले असा परिवार उघड्यावर पडला आहे .रोजगाराच्या शोधात इतरत्र फिरूनही आठवड्यातील एखाद्या दिवशीच रोजगार मिळत होता. निकुळे कुटुंबाच्या रोजगार हमीच्या जॉबकार्ड वर २००७-०८ पासून आजतागायत कसल्याही रोजगाराची नोंद नाही. ग्रामपंचायतीने रोजगाराची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला होता पण काहीच कार्यवाही झाली नाही. कृषी, ग्रामपंचायत, तहसील अशा कोणत्याच यंत्रणेचे काम या गावापर्यंत पोहचलेच नाही. तर आदिम जमातीला घरकुल योजना लागू असतानाही त्यांना लाभ मिळाला नव्हता. घरात एक पातेले, तांब्या आणि भाकरी थापायला तवा इतकेच सामान आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णु सवरा यांच्या मतदारसंघातच ही आत्महत्या घडल्याने संताप व्यक्त होत आहे.या घटनेनंतर राजकारणही सुरू झाले असून सरकारी यंत्रणा न पोहोचल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी कुटुंबाची भेट घेऊन जीवनावश्यक वस्तूंबरोबरच रोख रकमेची मदत केली. निकुळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जवाबदारी घेऊ व मृत सुरेश यांच्या पत्नीला रोजगार देऊ असे जाहीर केले.