शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

विदर्भातील मासेमारी अवर्षणामुळे संकटात

By admin | Published: December 29, 2015 1:38 AM

गत तीन वर्षांपासून अनियमित आणि अल्प पावसामुळे नद्या आणि जलाशयांमधील जलसाठा कमी होत असल्याने विदर्भातील मासेमारीचा व्यवसाय संकटात सापडला आहे.

- दादाराव गायकवाड, कारंजा (वाशिम)

गत तीन वर्षांपासून अनियमित आणि अल्प पावसामुळे नद्या आणि जलाशयांमधील जलसाठा कमी होत असल्याने विदर्भातील मासेमारीचा व्यवसाय संकटात सापडला आहे.मासेमारी पहिला प्रकार म्हणजे नदी किंवा तलावात थेट जाळे टाकून मासेमारी करणे, तर दुसरा कंत्राटी पद्धतीने जलप्रकल्पात मत्स्यबीज टाकून त्याचे संगोपन करणे. विदर्भात थेट मासेमारी करणारे दोन समाज आहेत. भोई आणि ढिवर या समाजाची निश्चित संख्या देशात उपलब्ध नसली, तरी विदर्भात या समाजाची लोकसंख्या जवळपास पाच लाखांच्या घरात आहे. विदर्भातील नद्यांमध्ये सुमारे १५०-२०० प्रजातींचे मासे आढळतात. पूर्वेकडच्या जिल्ह्यांमधील नद्यांमध्ये माशांची विविधता जास्त प्रमाणात बघायला मिळते. विदर्भात आढळणाऱ्या दुर्मीळ अशा माशांमध्ये तंबू, कोलशी, खवली, वाडीस, पोडशी, पालोची, बोद इत्यादींचा समावेश होतो. नदीमधून मासळ्यांच्या अनेक प्रजाती लुप्त झालेल्या आहेत. प्रदूषण, मोठी धरणे, तसेच पर्यावरणातील बदलामुळे नद्या मृतप्राय होत आहेत. नद्या शहरांचा मैला वाहून नेणारी गटारं बनल्याने गावरान मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. परिणामी, अनेक कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. वर्धा व वैनगंगा दक्षिण वाहिनी असून, त्यांचा उगम मध्यप्रदेशात आहे. गोदावरी खोऱ्यात वैनगंगा, प्राणहिता, पैनगंगा, वर्धा आणि इंद्र्रावती या नद्यांचा, तर तापी खोऱ्यात पूर्णा, मोर्णा, काटेपूर्णा नद्यांचा समावेश होतो. या नद्यांना पाणी नसल्यामुळे थेट भोई व ढिवर समाजावर उपासमारीची पाळी आली आहे.