शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
3
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
4
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
5
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
6
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
7
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
8
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
9
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
11
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
12
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
13
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
14
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
15
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
16
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
17
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
18
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
19
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
20
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर

त्रास फक्त गरिबांनाच

By admin | Published: November 16, 2016 5:51 AM

केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचा सर्वाधिक त्रास गोरगरीब जनतेला होत असून काळा पैसा बाळगणारे विजय मल्ल्या,

मुंबई : केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदी निर्णयाचा सर्वाधिक त्रास गोरगरीब जनतेला होत असून काळा पैसा बाळगणारे विजय मल्ल्या, ललित मोदींसारखे लोक परदेशात निघून गेले, अशा शब्दांत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. भिवंडी कोर्टात हजर राहाण्यासाठी मुंबईत आलेले राहुल यांनी मंगळवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. सरकारने नोटाबंदीच्या निर्णयाची माहिती भाजप नेत्यांना अगोदरच दिली होती. तसे नसते तर पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांनी आधीच पैसे डिपॉझीट कसे केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.काँग्रेस पक्ष काळ्यापैशाविरोधात आहे. मोदींनी निर्णय घेतला त्याला आमची हरकत नाही. मात्र निर्णय घेण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक होते, असे सांगून ते म्हणाले नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हसत होते आणि नंतरच्या गोव्यातील भाषणात मात्र रडत होते. नोटांसाठी लागलेल्या रांगांमध्ये आजवर १८ लोक मेले. त्यामुळे मोदींनी हसायचे की रडायचे हे आधी ठरवावे, असा टोलाही राहुल यांनी लगावला. मोदी आणि माझ्यात खूप फरक आहे. त्यामुळेच मी त्यांच्या मातोश्री पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, असे सांगून राहुल म्हणाले, नोटाबंदीचा त्रास गरीबांनाच होत आहे. काळा पैसा बाळगणारा एकही मोठा मासा बँकांच्या रांगेत कुठेही दिसला नाही. नोटाबंदीचा निर्णय घेताना अर्थमंत्री अरुण जेटली यांना अंधारात ठेवण्यात आले. सर्वसामान्य जनतेला आर्थिक खाईत लोटणारा निर्णय घेऊन सरकारने काय साधले, असा सवालही राहुल यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)