शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

‘कायद्याचे खरे नायक वाळीतग्रस्तच’

By admin | Published: April 15, 2016 2:12 AM

महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून लोकांचे संरक्षण विधेयक सरकारने मंजूर केले आणि आता हा कायदा अमलात येईल, याचे खरे श्रेय या कुप्रथेचा जाच वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या आणि अन्यायाविरोधात

- जयंत धुळप,  अलिबागमहाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून लोकांचे संरक्षण विधेयक सरकारने मंजूर केले आणि आता हा कायदा अमलात येईल, याचे खरे श्रेय या कुप्रथेचा जाच वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या आणि अन्यायाविरोधात लढणाऱ्या शेकडो वाळीतग्रस्तांचेच आहे. न्यायासाठी त्या प्रक्रियेची चक्रे फिरवणाऱ्यांचे ते श्रेय असते आणि येथे ही चक्रे फिरवणारे वाळीतग्रस्तच आहेत, अशी स्पष्ट प्रतिक्रिया या कायद्याचे प्रारूप तयार करणारे मानवी हक्क क्षेत्रातील अ‍ॅड. असीम सरोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.संतोष जाधव सामाजिक बहिष्कार प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, खंडपीठाने सामाजिक बहिष्कार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याबाबत राज्याच्या पोलीस विभागास दिलेल्या मार्गदर्शक सूचना व त्यांची तत्काळ अंमबजावणी हा या कायदा निर्मिती प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि सकारात्मक पहिला टप्पा ठरला आणि वाळीतग्रस्तांना मोठा आशेचा किरण सर्वप्रथम दिसला. त्यातून वाळीतग्रस्त पोलीस ठाण्यात येऊन तक्रारी दाखल करू लागले, असे अ‍ॅड. सरोदे यांनी सांगितले.या कायदा निर्मितीच्या महत्त्वाच्या प्रक्रियेचा विचार करून या कायद्याचे प्रारूप तयार केले. ते शासन आणि विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता सामाजिक कार्यकर्त्या प्रिया खान यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी कायद्याचे प्रारूप सादर करण्याची संधी दिली, असेही अ‍ॅड. सरोदे यांनी नमूद केले.