शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

टीव्ही टाळला; कुटुंबाचा संवाद जपला

By admin | Published: March 02, 2015 12:08 AM

हिरलगेतील देसाई कुटुंब : तीस वर्षांपूर्वीच्या निर्णयाने नात्यातील वीण झाली घट्ट, राज्यात आदर्श

संतोष मिठारी -- कोल्हापूरशिक्षण झाले, नोकरी लागली अथवा व्यवसाय चांगला चालला आणि हातात चार पैसे आले की, घरांत सुधारणा, सुख-सोयीच्या वस्तू आणण्याची लगबग सुरू होते. त्यात प्राधान्याने दूरदर्शन संचाचा (टी.व्ही.) समावेश असतो. सुख-सोयीसाठी घेतलेला हाच टी.व्ही. पुढे कुटुंबात विसंवाद निर्माण करतो. त्याची अनेक उदाहरणे आहेत; पण याला अपवाद ठरले आहे, ते हिरलगे (ता. गडहिंग्लज) मधील देसाई कुटुंबीय. कुटुंब एकत्र राहावे, शिवाय एकमेकांमधील संवाद कायम राहावा म्हणून देसाई कुटुंबीयांनी आजतागायत घरी टी. व्ही. घेतलेला नाही.देसाई यांचे २५ जणांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यात निवृत्त विस्तार अधिकारी बाबासाहेब देसाई, हिरलगेतील सोसायटीचे अध्यक्ष मानसिंग, बँकेतील निवृत्त अधिकारी कृष्णराव, गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष आणि नोकरदार वसंतराव हे पाच भाऊ आहेत. या सर्वांची मुले-मुली सध्या भारतीय सैन्यदल, अभियंता, डॉक्टर, प्राध्यापक, नोकरी, आदी क्षेत्रांत कार्यरत आहेत. या कुटुंबाला टी. व्ही. घेणे सहजशक्य आहे; पण वडिलधाऱ्यांनी ठरविलेले टी.व्ही. न वापरण्याचे तत्त्व कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पाळले आहे. सध्या टी. व्ही. म्हणजे बहुतांश जणांचा जीव की प्राण बनला आहे. एकवेळ घरच्या लोकांची विचारपूस केली जात नाही; पण टी. व्ही. मालिकांमधील पात्रे, त्यातील कथांवर तासन्-तास गप्पा, चर्चा केली जाते. विविध स्वरूपांतील मालिका, गेम-शो, आदी कार्यक्रमांनी घरा-घरांमधील संवाद कमी होत असल्याचे वास्तव आहे. अशा स्थितीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा सर्वांशी संवाद कायम राहावा, एकत्रित कुटुंब कायम राहावे या उद्देशाने देसाई कुटुंबीयांनी पाळलेले हे तत्त्व आदर्शवत ठरणारे आहे.‘अटॅचमेंट’ वाढलीघरात टी.व्ही. नसल्यामुळे दिवसभरातील आपापली कामे आटोपून सायंकाळी कुटुंबातील सर्व सदस्य जेवण घेतल्यानंतर एकत्रित बसून गप्पा मारतात, चर्चा करतात. वैयक्तिक तसेच कौटुंबिक पातळ्यांवरील काही प्रश्नही सोडविले जातात, महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. त्यातून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची एकमेकांशी तसेच त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळींसमवेत ‘अटॅचमेंट’ वाढली आहे. आमचे वडील शिक्षक होते. त्यांनी व आईने पाचही भावंडांनी कायम एकत्रित राहावे, कुटुंबात सुसंवाद राहावा यासाठी घरात टी.व्ही. न वापरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आज ३० वर्षे झाली. या निर्णयाचे पालन तिसरी पिढी करत आहे. वृत्तपत्रे, रेडिओचा वापर मनोरंजन, विविध घडामोडी समजावूून घेण्याााठी करतो. टी. व्ही. टाळल्याने कुटुंबांतील संवाद कायम आहे आणि त्याचे एक वेगळे समाधान आम्हा सर्वांना आहे. - सुभाष देसाई