शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

बारा जातपंचायती बरखास्त

By admin | Published: March 22, 2016 4:13 AM

येथील भटके जोशी समाजाने जातपंचायत बंद करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने राज्यातील बारावी जातपंचायत बरखास्त झाली आहे.

नाशिक : येथील भटके जोशी समाजाने जातपंचायत बंद करण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने राज्यातील बारावी जातपंचायत बरखास्त झाली आहे. मात्र मनमानी कारभार करणाऱ्या हजारो जातपंचायती अद्यापही राज्यात कार्यरत असल्याचा अंदाज आहे.तीन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाहाचा राग मनात ठेवून पित्यानेच आपल्या नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या मुलीचा खून केल्याची घटना नाशिकमध्ये घडली होती. जातपंचायतीच्या दबावातून ही हत्या झाल्याचे समोर आले आणि त्यातून जातपंचायतींचा निर्दयी कारभारही उजेडात आला. अंनिसचे संस्थापक दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अनिष्ट जातपंचायतींच्या विरोधात लढा उभारला. आॅगस्ट २०१३ मध्ये नाशिकमध्ये जातपंचायत मूठमाती परिषद झाली. त्यानंतर येथील कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी हा लढा सुरू ठेवला. आतापर्यंत राज्यातील बारा जातपंचायती बरखास्त झाल्या आहेत.अहमदनगरच्या मढी व माळेगाव येथे जातपंचायतींची केंद्रे होती. तेथे शेकडो जातपंचायती भरत आणि त्यासाठी हजारो लोक जमत, मात्र प्रबोधनामुळे दोन वर्षांपासून दोन्ही ठिकाणी एकही जातपंचायत भरलेली नाही. (प्रतिनिधी)