शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

युतीमुळेच भाजपचे पंचवीस वर्षे झाले नुकसान

By admin | Published: April 29, 2015 10:13 PM

बाळ माने : राजकारणातील पोकळी भरून काढण्यास भाजपला अपयश आल्याची कबुली

मंडणगड : पंचवीस वर्षांच्या युतीच्या राजकारणात भाजपचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे राजकारणात पोकळी निर्माण होऊन ती भरुन काढण्यास पार्टीस अपयश आले त्याचा फटका सर्वच निवडणुकात सोसावा लागला आहे, अशी कबुली प्रतिपादन भाजपा प्रदश प्रवक्ते बाळ माने यांनी मंडणगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.भाजपा सदस्य नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा दौरा करणाऱ्या माने यांनी विविध प्रश्नावर पत्रकारांशी संवाद साधला. यात आगामी काळात जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजपा-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या स्वबळावरील निवडणुका हा पक्षासमोर अतिशय महत्त्वाचा मुद्दा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.निवडणुकांमध्ये पक्षाचे अस्तित्त्व दाखवून देण्यासाठी कार्यकर्ते कामास लागले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवेचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामे वास्तवात आणण्यासाठी हे गाव दत्तक पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या आदर्श ग्राम विकास योजनेच्या घोषणेअंतर्गत खासदार अमर सांबळे यांनी दत्तक घेतले असल्याचे त्यांनी सांगीतले.जिल्ह्यात एक लाख सदस्य नोंदणी व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मिशन थर्टीप्लस या दोन विषयांवर भाजपने जिल्ह्यात आपले लक्ष केंदी्रत केले आहे, असे ते म्हणाले. कोकणातील पक्षाची व्याप्ती लक्षात घेता अगदी ग्रामपंचायत स्तरापासून पक्षाचे काम वाढेल, यावर लक्ष देण्यात आले असून नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शक्य आहे तेथे उमेदवार उभे करण्यात आले. देवगड, गुहागर व रत्नागिरी मतदारसंघांपुरती पक्षाची ओळख मर्यादित न ठेवता सर्वच ठिकाणी वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. २०१७ जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समिती गण बांधण्याचे काम सुरु आहे. तालुक्यात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न सुरू असून येथे लघु उद्योगांची निर्मिती करुन पर्यटन मत्सव्यवसायाचे माध्यमातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत, असे माने यांनी यावेळी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन थोरे, उपाध्यक्ष राजेश नगरकर, युवा आघाडी तालुकाध्यक्ष गिरीष जोशी आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)