शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

दोन सावकारांना अटक

By admin | Published: December 30, 2015 12:54 AM

बनेवाडी प्रकरण : निवृत्त पोलिसाचा समावेश; आणखी दोघांची नावे निष्पन्न

इस्लामपूर : बनेवाडी (ता. वाळवा) येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन सावकारांना मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्यात एक निवृत्त पोलिसाचा समावेश आहे. याबाबत चौघा सावकारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, यासह सावकारी गुन्ह्यांची नोंद मंगळवारी पहाटे तीन वाजता करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये मोहन केशव पाटील (वय ४२, रा. ताकारी, ता. वाळवा) व निवृत्त पोलीस जयवंत विष्णू पाटणकर (५२, रा. बोरगाव) यांचा समावेश आहे. श्रीकांत चमणराव जाधव, विकास कुमार पाटील (दोघे रा. ताकारी) हे संशयित फरारी आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी मृत संजय यादव यांचे मेहुणे संजय महादेव खोत (रा. पडवळवाडी, ता. वाळवा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून सोमवारी पहाटे संजय भीमराव यादव (५०, रा. बनेवाडी) यांच्यासह त्यांची पत्नी जयश्री यादव (३०) यांनी आत्महत्या केली होती. तत्पूर्वी, मुलगा राजवर्धन (४ वर्षे) आणि मुलगी समृद्धी (४ महिने) यांना यादव दाम्पत्याने गळा आवळून ठार मारले होते. जयश्री व संजय यांचा २०१० मध्ये विवाह झाला होता. तीन वर्षांपूर्वी आईचे आजारपण, पत्नीचे बाळंतपण व बेकरी व्यवसायामुळे त्यांची आर्थिक ओढाताण झाली होती. त्यामुळे संजय यादव यांनी सावकारांकडून वेळोवेळी सात ते आठ लाख रुपयांचे मासिक दहा टक्केव्याजाने कर्ज घेतले होते. दोन वर्षांपूर्वी यादव यांनी पत्नीचे गंठण गहाण ठेवून व्याजापोटी सावकारांना ५० हजार रुपये दिले होते. त्यावेळी विकास पाटील यांचे तीन लाख रुपयांचे व्याज देऊनही तो पाच लाखांची मागणी करीत होता. श्रीकांत जाधव एक लाख रुपये व्याजासह मागत होता, तर जयवंत पाटणकर २० हजारांसाठी, मोहन केशव पाटील ३० हजार रुपयांसाठी तिप्पट रकमेची मागणी व्याजासह करीत होते.या दरम्यान मेहुणे संजय खोत यांनी यादव यांना एक लाख रुपये व म्हैस दिली होती. त्यावेळीही यादव यांनी सावकारांचे व्याज भागविले होते. मात्र, तरीही पाटणकर हा म्हैस घेऊन जाण्याची धमकी देत होता. ही माहिती यादव यांनी २५ डिसेंबरला मेहुणे संजय यांना दिली होती. जयश्री यांनीही दूरध्वनीवरून ‘चौघे सावकार पैशांचा तगादा लावत आहेत, त्यामुळे पैशांची काहीतरी तरतूद कर, नाहीतर पती आम्हाला घरातून हाकलून देतील’, असे मेहुण्याला सांगितले होते. २७ डिसेंबरला संजय यादव मुलगा राजवर्धनला घेऊन पडवळवाडीला गेले होते.त्यावेळीही त्यांनी ‘पाटणकर हा ६५ हजार रुपये मागतोय, त्यासाठी थोडे पैसे द्या’, अशी विनंती मेहुण्याला केली होती. त्यांनी म्हैस विकून येतील ते पैसे द्या, असा सल्ला दिला. त्यानंतर संजय यादव यांनी संपूर्ण कुटुंब संपविण्याचा निर्णय घेतला, असा पोलिसांचा अंदाज आहे. (वार्ताहर)चिठ्ठीतील मजकूर उघडसावकार श्रीकांत जाधव, विकास पाटील (ताकारी) यांनी नोटरी करून धनादेश घेतले आहेत. पाटणकर आप्पा (बोरगाव) याने चार धनादेश घेतले आहेत, तर मोहन आबाने दोन धनादेश घेतले आहेत. या सर्वांच्या त्रासाला कंटाळून सर्व कुटुंब आत्महत्या करीत आहे. घेतलेल्या रकमेला सावकारांकडून प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपये दंड लावला जात होता. कोरे धनादेश घेऊन पैसे दिले नाहीस, तर गावातून हाकलून देण्याची धमकी देत होते, असे संजय यादव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.