शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

दुष्काळग्रस्तांसाठी दोन महिन्यांचा पगार

By admin | Published: September 16, 2015 12:26 AM

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले हे आपल्या खासदारकीचे दोन महिन्यांचे वेतन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत.

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले हे आपल्या खासदारकीचे दोन महिन्यांचे वेतन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत. २०, २१ आणि २२ सप्टेंबरदरम्यान ते दुष्काळी दौऱ्यावर जात असून, उस्मानाबाद येथील दुष्काळ परिषदेने या दौऱ्याची सांगता होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. वांद्रे येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले की, दुष्काळावर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे. जास्त पाऊस पडणाऱ्या मुंबई व कोकणातील पाणी दुष्काळी प्रदेशांमध्ये वाहून नेण्याची आवश्यकता आहे. तसा आराखडा बनविण्याची मागणी १५ वर्षांपासून करत आहोत; मात्र केंद्र व राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत आठवले यांनी व्यक्त केली. दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी अभ्यासगटाची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेत असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. मात्र आता विरोधी बाकांवर बसायची वेळ आल्यावर ते मागणी करीत आहेत. त्यांनी सिंचनाचे क्षेत्र वाढवले असते तर दुष्काळाशी चांगला सामना करता आला असता, असा टोलाही आठवले यांनी लगावला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या भेटीकडे राजकीय नजरेने पाहण्याची गरज नाही, असेही आठवले यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. सढळ हस्ते मदत करावी तीन दिवसांच्या दौऱ्यात मी सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर व उस्मानाबाद या सहा जिल्ह्यांना भेटी देणार आहे. उद्योगपती, बॉलीवूड क्षेत्रातील व्यक्ती व सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करावी. - आठवले