शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दोन गाड्या, एक गांधीजी चालवताहेत, तर दुसरी सावरकर, तुम्ही कुठे बसाल? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 17:26 IST

Devendra Fadnavis : मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नावर फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची आता चर्चा होत आहे.

महत्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून गेल्या काही काळापासून राज्यातील राजकारण तापलेलं आहे. तसेच या मुद्द्यावरून राजकीय पक्ष आणि नेत्यांपासून विचारवंत आणि सोशल मीडियापर्यंत दोन पडल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नावर फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची आता चर्चा होत आहे.

या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं की, समजा कोस्टल रोड खुला झाला आहे आणि तुमच्यासमोर लाँग ड्राईव्हला जाण्यासाठी गाड्यांचे दोन पर्याय आहेत. त्यातील एक गाडी ही महात्मा गांधी चालवत आहेत. तर दुसरी गाडी ही स्वातंत्र्यवीर सावरकर चालवत आहेत. असं झालं तर तुम्ही कुठल्या गाडीत बसाल? या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,’’ मला स्वत:ला गाडी चालवायला आवडेल. मी त्यांना म्हणेन की, मी गाडी चालवत असताना ज्यांना कुणाला माझ्या गाडीत बसायला आवडेल, त्यांचं स्वागतच आहे’’. फडणवीसांच्या या युक्तिवादपूर्व विधानाला उपस्थितांनीही जोरदार दावा, केला.

गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यात भाजपाने काही नवे मित्रपक्ष जोडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपा सत्तेसाठी कुणालाही सोबत घेऊ शकतो, अशी टीका सुरू झाली आहे. त्यावरून कुठल्या पक्षासोबत भाजपा युती करणार नाही, असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस असं उत्तर दिलं. ते म्हणाले की, राजकारणात कधीच कुणी शत्रू नसतो. आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक असतो. मात्र आम्ही काँग्रेसच्या राजकीय धोरणांच्या विरोधात आहोत. त्यामुळे जे त्या विचारसरणीसोबत राहतील, त्यांच्यासोबत आम्ही कधी युती करणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahatma Gandhiमहात्मा गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपाcongressकाँग्रेस