शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

उदय सामंत यांचा मोठा खुलासा; संजय राऊत-विजय वडेट्टीवारांवर पलटवार, म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:53 IST

जे विधान संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केले ते धादांत खोटे आहे असं सांगत सामंत यांनी विजय वडेट्टीवारांबाबत गौप्यस्फोट केला. 

मुंबई - राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर होताच पुन्हा एकदा महायुतीत नाराजीची ठिणगी पेटली आहे. याच नाराजीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी गेलेत. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात लवकरच नवा भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. उदय सामंत यांच्या नेतृत्वात सेनेचे २० आमदार भाजपात जाऊ शकतात असा दावा करण्यात येत आहे. त्यावरच दावोस दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मंत्री उदय सामंत म्हणाले की, वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या कार्यक्रमाला मी दावोसला पोहचलोय. याठिकाणी संजय राऊत यांनी माझ्याबाबतीत केलेलं विधान मी ऐकलं. हा धादांत राजकीय बालिशपणा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो उठाव केला त्यात मी सहभागी होतो. त्यातूनच मला राज्याचे २ वेळा उद्योगमंत्रिपद मिळाले याची मला जाणीव आहे. सर्वसामान्य नेत्याने माझ्या राजकीय जीवनात मला घडवण्यासाठी केलेले प्रयत्न मी कधीच विसरू शकत नाही. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. त्यामुळे आमच्या दोघांमध्ये कुणीही वाद लावण्याचा केविळवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच विजय वडेट्टीवार यांनीही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहेत. मीदेखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालोय, तुम्हीही सर्वसामान्य कुटुंबातून आला आहात. त्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातील लोक एकत्र असताना त्यांना बाजूला करण्याचा षडयंत्र करू नका. तुम्हीही भाजपात येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची किती वेळा भेट घेतली याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. परंतु काही राजकीय पथ्य मी पाळतो. त्यामुळे मी कधीही वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कुणी करू नये. जे विधान संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केले ते धादांत खोटे आहे. या विधानाचा मी निषेध करतो. मी एकनाथ शिंदेंसोबत होतो आणि भविष्यात ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल तेव्हा मी त्यांच्यासोबत असेन. त्यामुळे अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही. यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमजही होणार नाहीत असा टोला मंत्री सामंत यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांना लगावला. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतSanjay Rautसंजय राऊतVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस